मुंबई : महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद आता चांगलाच चिघळला असल्याचे पाहायला मिळत आहे. कर्नाटकात महाराष्ट्रातील ट्रकवर कन्नड रक्षण वेदिका संघटनेच्या कार्यकर्त्यांनी दगडफेक केल्याची घटना घडल्यानंतर त्याचे राज्यात तीव्र पडसाद उमटले. दरम्यान याच घटनेनंतर कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी आपली भूमिका कायम असल्याचे सांगितले. अशातच बसवराज बोम्मई यांनी सोलापूर आणि सांगलीतील काही गावांवर दावा सांगितला. यानंतर महाराष्ट्रातील मंत्री चंद्रकांत पाटील आणि मंत्री शंभूराज देसाई आज ( ६ नोव्हेंबर ) बेळगाव दौऱ्यावर जाणार होते. पण, कर्नाटक सरकारच्या आडमुठ्या धोरणामुळे हा दौरा रद्द केल्याची माहिती शंभूराज देसाई यांनी दिली.
एका बाजूला शेतकरी त्रस्त आहेत. महिलांवर अत्याचार वाढत आहेत. उद्योग महाराष्ट्रातून एका राज्यात पाठवलेत. आता आपल्या महाराष्ट्राची गावं दुसऱ्या राज्यात पळवण्याचा प्रयत्न सुरु आहे. पण घटनाबाह्य मुख्यमंत्री मात्र ह्या सगळ्यावर गप्प का?
— Aaditya Thackeray (@AUThackeray) December 6, 2022
बसवराज बोम्मई यांनी सोलापूर आणि सांगलीतील काही गावांवर दावा सांगितला,’एका बाजूला शेतकरी त्रस्त आहेत. महिलांवर अत्याचार वाढत आहेत. उद्योग महाराष्ट्रातून एका राज्यात पाठवलेत. आता आपल्या महाराष्ट्राची गावं दुसऱ्या राज्यात पळवण्याचा प्रयत्न सुरु आहे. पण घटनाबाह्य मुख्यमंत्री मात्र ह्या सगळ्यावर गप्प का? महाराष्ट्रधर्माशी केलेली गद्दारी आहे! स्वतःसाठी दुसऱ्या राज्यात पळून गेले, पण महाराष्ट्रासाठी बेळगावला जात नाहीत? राग ह्या गोष्टीचा येतो की, खरंतर जो विषय चर्चेचा नाही त्यावर चर्चा करायला निघाले होते, पण कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी दम देताच आपले मंत्री घाबरून तिथे गेलेच नाहीत. एवढं हतबल सरकार महाराष्ट्रात कधीच नव्हतं.!’ अस म्हणत आदित्य ठाकरेंनी टीका करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही लक्ष्य केलं आहे.