वडगावशेरी, दि. 15 (प्रतिनिधी) -कॉंग्रेस पक्षाचे नेते खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली कन्याकुमारी ते काश्मीर ही 3500 कि.मी.ची “भारत जोडो यात्रा’ सुरू आहे. महाराष्ट्रामध्ये नांदेड, हिंगोली, वाशिम, अकोला व बुलढाणा या जिल्ह्यांतून ही यात्रा पुढे मार्गस्थ होत आहे. यामध्ये पुण्यातील विद्यार्थी कॉंग्रेसचे नेते संकेत गलांडे यांची हिंगोलीमध्ये राहुल गांधी यांच्यासोबत चालण्याची व संवाद साधण्याची संधी मिळाली.
याबाबत संकेत गलांडे म्हणाले की, भारत जोडो यात्रेमध्ये आम्ही सुरुवातीपासून राहुल गांधी यांच्या सोबत चालत आहोत, प्रत्येक जिल्ह्यात यात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद व प्रेम मिळत आहे. यामध्ये हिंगोलीमध्ये मला राहुलची गांधी यांच्या सोबत चालण्याची व चर्चा करण्याची संधी मिळाली. यावेळी संघटनेविषयी व शिक्षण क्षेत्रातील काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर राहुल यांच्यासोबत चर्चा केली. राहुल यांना काही मुद्दे आवडल्याने पुन्हा सविस्तर चर्चा करण्यास मला निमंत्रित केले. भारत जोडो यात्रेमध्ये राहुल यांनी माझा हात हातात घेऊन चालले व मनापासून माझे मुद्दे ऐकून त्यावर संवाद साधला हे माझ्यासाठी अविस्मरणीय व आयुष्यभर प्रेरीत करणारा क्षण आहे. महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री आमदार विश्वजीत कदम यांनी ही भेट घडून दिल्याचे संकेत गलांडे यांनी सांगितले.