मुंबई – पश्चिम रेल्वेने शनिवारी मुंबई विभागातील प्रमुख रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म तिकीटाचा दर 10 रूपयावरून 50 रूपये इतका करण्याचा निर्णय घेतला आहे. सणासुदीच्या काळात होणारी गर्दी रोखण्यासाठी ही तात्पुरती उपाययोजना आहे असे पश्चिम रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. हे वाढीव दर 31 ऑक्टोबरपर्यंतच कायम असतील.
मुंबई विभागातील मुंबई सेंट्रल, दादर, बोरिवली, वांद्रे टर्मिनस, वापी, वलसाड, उधना आणि सुरत स्थानकांवर हे प्लॅटफॉर्म तिकीट दर वाढवण्यात आले आहेत.दिवाळीच्या काळात रेल्वे स्थानकांवर तसेच फूट ओव्हरब्रिजवर मोठी गर्दी होते.
ती नियंत्रीत करणे हे एक आव्हानात्मक काम आहे. त्यासाठी अन्यही काही उपायोजना केल्या जात आहेत. सुटीच्या काळात प्रवाशांच्या सोयीसाठी अनेक हॉलिडे स्पेशल गाड्या सोडल्या जाणार आहेत त्यामुळे प्रमुख रेल्वे स्थानकावर वाढीव गर्दी होण्याची शक्यता आहे.