मुंबई : अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीसंदर्भात सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. या निवडणुकीतुन भाजपने माघार घेतली असल्याचे सांगण्यात येत आहे. आहे. भाजपाने मुरजी पटेल यांचा उमेदवारी अर्ज मागे घेणार असल्याची घोषणा केली आहे. यामुळे ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा पटेल यांचा बिनविरोध निवडून येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
भाजपने निवडणुकीतून घेतलेली माघार हा ठाकरे गटासाठी हा मोठा दिलासा मानाला जात आहे. यासंदर्भात भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी माहिती दिली. दरम्यान, यानंतर ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांनी सर्वपक्षीयांचे आभार मानले आहेत.
दरम्यान, या निवडणुकीवरुन शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) विरुद्ध भाजपा असा संघर्ष सुरु असतानाच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लिहिलेल्या पत्रामुळे वळण मिळाले होते. त्यानंतर वेगाने घडामोडी सुरु झाल्या आणि अखेर ही निवडणूक बिनविरोध करण्याचा निर्णय झाला.
Maharashtra | BJP state president Chandrashekhar Bawankule has announced in Nagpur that the party will not contest Mumbai’s Andheri East assembly by-election and their candidate Murji Patel will withdraw the nomination.
— ANI (@ANI) October 17, 2022
दरम्यान, भाजपाचे मुंबई अध्यक्ष आशीष शेलार यांनी रविवारी राज ठाकरे यांची भेट घेत, भाजपा उमेदवाराला पाठिंबा देण्याची विनंती केली होती. राज ठाकरे यांनी मात्र भाजपाची विनंती अमान्य करीत उलट तुम्हीच या निवडणुकीतून माघार घेत लटके यांना पाठिंबा देण्याची विनंती करीत भाजपाची कोंडी केली होती. राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवून अंधेरी विधानसभा पोटनिवडणूक लढवू नका, असं आवाहन केलं होतं.