चंदिगढ – 2024 मध्ये केंद्रात सत्ताबदल करण्यासाठी एकत्र येण्याची वेळ आली असल्याचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटले आहे. ते म्हणाले की, शेतकऱ्यांनी दिल्लीच्या सीमेवर वर्षभर आंदोलन केले. मात्र त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी सरकारने कोणतेही पाउल उचलले नाही.
शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांच्या गाडीवर हल्ला
एमएसपीचे आश्वासन शेतकऱ्यांना देण्यात आले. तेही पूर्ण केले गेले नाही. शेतकऱ्यांच्या विरोधातील गुन्हे मागे घेण्याचा शब्द दिला गेला होता. तोही पाळला नाही. शेतकरी आत्महत्या करत आहेत. मात्र आत्महत्या काही उपाय नाही तर केंद्रातील सरकारमध्ये बदल करणे हा उपाय असल्याचे त्यांनी नमूद केले.