मुंबई – बिहार येथील पाटलीपुत्र येथे 1 ते 4 सप्टेंबर या कालावधीत होणाऱ्या 48 व्या कुमारी गट राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेकरिता महाराष्ट्राने आज आपला 12 जणांचा संघ जाहीर केला. मुंबई उपनगरच्या सानिका परेश पाटील हिच्याकडे संघाच्या नेतृत्वाची कमान सोपविण्यात आली.
सध्या हा संघ अतिग्रे कोल्हापूर येथील संजय घोडावत उद्योग समूह यांच्या संयोजनाखाली संजय घोडावत विद्यापीठाच्या बंदिस्त क्रीडा संकुलात सराव करीत आहे. प्रशिक्षिका वर्षा भोसले खेळाडूंकडून डावपेचाचे धडे गिरवून घेत आहे. घोडावत उद्योग समूहाचे चेअरमन संजय घोडावत यांनी संघाला शुभेच्छा दिल्या.
घोडावत विध्यापिठाचे विश्वस्त विनायक भोसले, प्राचार्य विराट गिरी या सराव शिबिरात कोणतीही कसर राहू नये म्हणून लक्ष ठेऊन आहेत. संघाचे प्रशिक्षक महेश गावडे यात समन्वयक म्हणून काम बघत आहेत, अशी माहिती राज्य कबड्डी संघटनेचे सरचिटणीस आस्वाद पाटील यांनी दिली.
संघ : 1) सानिका परेश पाटील – कर्णधार, 2) याशिका पुजारी (दोन्ही मुंबई उपनगर), 3) रेणुका नम, 4) ज्युली मिस्किटा, 5) श्रुती सोमाणे (तिघी पालघर), 6) तृप्ती अंधारे, 7)कोमल ससाणे (दोन्ही औरंगाबाद), 8) अनुजा शिंदे, 9) ऋतुजा आंबी (दोघी सांगली), 10) मनिषा राठोड (पुणे), 11) सानिका पाटील (नांदेड), 12) प्राची भादवणकर (मुंबई शहर). संघ प्रशिक्षिका : वर्षा भोसले, संघ व्यवस्थापिका : कोमल चव्हाण.