मुंबई – शिवसेना नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे बंडखोरी केल्यानंतर आपल्यासोबत 46 आमदार असल्याचा दावा केला आहे. त्यामुळ महाराष्ट्राच राजकारण ढवळून निघालं आहे. यावरून मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. त्याला आता एकनाथ शिंदेंनी सडेतोड उत्तर दिले आहे. अशाच खरी शिवसेना कुणाची असा प्रश्नही चर्चेत आला आहे. याच प्रश्नाचे उत्तर एकनाथ शिंदे यांनी दिले आहे.
टीव्ही वृत्तवाहिनीशी बोलतांना एकनाथ शिंदे म्हणाले,’मी किंवा माझ्या सोबतच्या आमदारांनी असा कोणताही दावा केलेला नाही. आम्ही बाळासाहेबांचे सैनिक असून आमच्याकडे बहुमत आहे. बैठकीनंतर गोष्टी स्पष्ट होतील”.असं म्हणत त्यांनी खरी शिवसेना कुणाची या चर्चेवर भूमिका स्पष्ट केली.
दरम्यान, शिंदे यांनी बंड पुकारल्यापासून यामागे भाजपची फूस असल्याचा आरोप महाविकास आघाडीतील नेते करत आहेत. अर्थात एकनाथ शिंदे यांनी बंडखोर आमदारांना ठेवण्यासाठी प्रथम गुजरात व त्यानंतर आसामची निवड केली होती. ही दोन्ही राज्यं भाजप शासित आहेत.