मुंबई : भारतातील मुख्य पीक म्हणून भात शेतीला आजही प्राधान्य दिले जाते. आजही भारतीयांचं प्रमुख अन्न भातच आहे. भाताच्या मूळ जातींमध्ये आता अनेक नव्या जातींचा समावेश झाला आहे. भाताच्या नव्या जाती शोधल्या गेल्या आहेत मात्र त्याचा दर्जा खालावल्याचे दिसते. त्यामुळे जुनं ते सोनं म्हणत जुन्या धानाच्या जातींचे संवर्धन करण्याचा विडा एका अवलियाने उचललाय … या अवलियाचं नाव आहे देबल डेब. ओरिसा येथील ते एक पर्यावरण शाश्त्रज्ञ आहेत. त्यांनी भाताच्या जुन्या वनांचे संवर्धन तर केले आहेच शिवाय हे क्षेत्र वाढण्यासाठी त्यांनी भाताच्या बियाण्यांची बँक स्थापित केली आहे. विशेष म्हणजे ही बँक 24 वर्षांपासून सुरु असून शेतकऱ्यांना या बँकेमधून मोफत वाण दिले जाते.
भाताच्या पेजेने दिली प्रेरणा
खरतर कोकणात तुम्ही गेलात तर आजही भाताची पेज खाण्याची पद्धत आहे. त्यामुळे पोटाच्या तक्रारी होत नाहीत. ताकद मिळते. असे म्हणतात. पर्यावरण शास्त्रज्ञ देबल डेब यांना धान बँक सुरु करण्यामागे असाच एक किस्सा आहे. डेब हे दक्षिण बंगालमध्ये झाडांच्या जैवविविधतेचे सर्वेक्षण करीत होते. त्यावेळी एका शेतकऱ्याची गर्भवती पत्नी ही भुतामुरी तांदळाची पेज पित असल्याचे दिसले. ही पेज पिल्याने महिला ही अॅनिमियासारख्या गंभाीर आजारातून बऱ्या होतात. त्यानंतर देब यांनी दुर्मिळ अशा तांदळाच्या जुन्या जातीवर संशोधन सुरु केले. 2001 मध्ये त्यांनी बासुधा नावाच्या फार्मची स्थापना केली. तर दक्षिण ओडिसा मधील रायगडा जिल्ह्यात एका आदिवासी गावात त्यांची 1 एकर 7 गुंठे एवढी जमीन आहे .
पुढे त्यांनी तांदळाच्या जातींबाबत आपले संशोधन सुरु ठेवले.1994 साली त्यांनी सर्वेक्षण सुरु केले. 2006 मध्ये त्यांचे सर्वेक्षण पूर्ण झाले. यादरम्यान त्यांना लक्षात आले की धानाच्या जवळपास 90 टक्के जाती गायब झाल्या आहेत. सरकार आणि अनेक खाजगी संस्थांनी मदत नाकारल्यानंतर, त्यांनी त्यांच्या संवर्धन आणि वृक्षारोपणाच्या ध्येयासाठी एकट्याने काम करण्याचा निर्णय घेतला, जो आज बासुधा बीज बँकच्या रूपाने पुढे आला आहे.
अशा प्रकारे आहे मोफत बियाणे बॅंकेचे व्यवहार
देब यांनी स्वत: प्रयत्न करुन ओडिशामध्ये एक अशी बॅंक उभारली आहे ज्यामधून आता शेतकऱ्यांना मोफत धान पिकासाठी बियाणे पुरवले जात आहेत. यामुळे देशी बियाणांची संस्कृती जोपासली जात आहे. तर तांदळाच्या जुन्या वाणांच्या देवाणघेवाणीला प्रोत्साहन दिले जात आहे.या बॅंकेत तांदळाच्या जुन्या वाणाचे बियाणे दिले जात आणि त्याबदल्यात शेतकऱ्याकडून कोणतेही वाण घेतले जाते. मातीच्या भांड्यात ही बिज अंकुरित केले जातात. शिवाय उत्पादन वाढीसाठी बियाणे हे गोमूत्राने सिंचित केले जाते. देब यांची ही बियाणे बॅंक 1998 मध्ये 21 वाण घेऊन सुरु झाली होती. आता त्यांच्याकडे जवळपास 1 हजार 440 जातीची बियाणे आहेत. तर याकरिता 7 हजार 600 पेक्षा अधिक शेतकरी राबत आहेत.
दुर्लभ बीजांचा समावेश
–देब यांच्या बियाने बँक मध्ये संपूर्ण भारतातील बियाण्यांच्या जाती आहेतच पण त्याच बरोबर बांगलादेश, श्रीलंका, पाकिस्तान, थायलंड, कोरिया, फिलीपिन्स इ. इटली अशा देशांमधील विविध धान्यच्या जाती देखील आहेत.
–याशिवाय त्यांच्या धान बँकेत जगातला एकमेव तांदूळ आहे ज्यामध्ये चांदीचा अंश असतो. ही धानाची जात तीन मीटर पाण्यात वाढते.
–शिवायअशा 15 प्रजाती देखील आहेत ज्या मीठ-सहिष्णु आहेत, त्यापैकी काही समुद्राच्या पाण्यात वाढू शकतात.
–त्यांच्याकडे बारा अशा भाताच्या जाती आहेत ज्या उष्णता असताना देखील घेतल्या जाऊ शकतात.