जबलपूर – नुपुर शर्मा प्रकरणात पाकिस्तान आणि पाकिस्तानशी जवळीक साधणाऱ्या गटांचा हात असल्याचा दावा केंद्रीय मंत्री प्रल्हाद पटेल यांनी केला.
मध्यप्रदेशमधील जबलपूर येथे बोलताना प्रल्हाद पटेल यांनी हा खळबळजनक दावा केला आहे. प्रगतीपथावरील भारताविषयी पाकिस्तानला मत्सर वाटतो.
भारताशी स्पर्धा करणे जमत नाही म्हणून पाकिस्तान आणि पाकिस्तानशी जवळीक साधणारी मंडळी इतर मार्गांनी भारतात कायदा सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न करत आहेत. पण केंद्र सरकार सतर्क आहे. कायद्याआधारे ज्यांच्यावर जी कारवाई व्हायला हवी ती होईल. पण बहुसांस्कृतिक देशात दरी निर्माण करण्यासाठी प्रयत्न करणाऱ्यांची मोठी संख्या हा एक चिंतेचा विषय आहे; असे पटेल म्हणाले.