पुणे – संभाजीराजे छत्रपती यांच्यावर शिवसेनेने अन्याय केला. भाजपशी चर्चा केली असती, तर राजे भाजपचे उमेदवार म्हणून निवडून आले असते. शिवसेनेने राजेंना दिलेला शब्द पाळला नाही.
महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आणि शिवसेनेने धोका दिल्यानेच आज राजेंना निवडणुकीतून माघार घ्यावी लागली,” अशी टीका केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली.
पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत आठवले बोलत होते. यावेळी रिपाइंचे शहराध्यक्ष शैलेंद्र चव्हाण, बाळासाहेब जानराव, डॉ. सिद्धार्थ धेंडे, परशुराम वाडेकर, अशोक कांबळे, अशोक शिरोळे, महिपाल वाघमारे आदी उपस्थित होते.
महापालिका निवडणुकांचा आढावा घेत आठवले म्हणाले, “पुण्यात रिपब्लिकन पक्ष भाजपसोबत पालिका निवडणूक लढणार आहे. तर, राज्यसभेची सहावी जागा आम्ही निवडून आणू. भाजपचा उमेदवार तेवढी मते मिळवण्यात यशस्वी ठरेल, असेही ते म्हणाले.