जम्मू – जम्मू काश्मीर आता बदलत आहे, मागील पिढींनी जो काही त्रास झाला, आता तो पुढे होणार नाही, या भागात अनेक विकास कामे केली जात आहेत, अजून त्यात नव्याने भर पडत आहे, जेणेकरून नव्या पिढीला, युवापिढीला रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध होतील, राज्याच्या प्रगतीवर लक्ष केंद्रीत केले असून रोजगार, व्यापार आणि आर्थिक विकास यांना प्राधान्य दिले आहे. याचा लाभ या राज्यातील तरुणांना होणार असून त्यांचे भवितव्य आज उज्ज्वल आहे, असे विश्वासपूर्ण उद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथे बोलताना काढले. त्यांच्या हस्ते राज्यासाठी 20 हजार कोटी रुपयांच्या योजनांचे उद्घाटन करण्यात आले.
जम्मू येथील सांबा विभागातील पल्ली येथे हा कार्यक्रम ‘पंचायती राज’ दिनानिमित्त आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाला राज्यभरातून 30 हजार स्थानिक स्वराज्य संस्था लोकप्रतिनिधी उपस्थित होते.
जम्मू – काश्मीर मधील काही घडामोडी
-2019 मध्ये जम्मू-काश्मीर राज्याला विशेष दर्जा देणारे घटनेचे
अनुच्छेद 370 आणि 35 अ हे निष्प्रभ करण्यात आले
-20 हजार कोटींच्या योजना
यात 500 मेगावॅटच्या सौर वीज प्रकल्पाचाही समावेश
– या महत्वाकांक्षी प्रकल्पांमुळे युवकांना रोजगार मिळणार
राज्याच्या आर्थिक विकासाचा वेग वाढणार
पददलितांना मिळणार लाभ
– स्वातंत्र्यानंतर 75 वर्षांनी आज प्रथमच येथील वाल्मिकी समाजाला
इतर कोणत्याही नागरीकाच्या तोडीचा दर्जा मिळाला