औरंगाबाद – वैवाहिक आयुष्यात काही अनिष्ट कारणामुळे पती -पत्नी वेगळे होतात. संसार मोडतात. अश्या प्रकरणामध्ये पतीने आपल्या बायकोला पोटगी द्यावी लागते, असे आपण ऐकत आलो आहे. किंवा परिस्थिती नुसार न्यायालय निर्णय देत असते. मात्र आज मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाने याबाबतचा महत्त्वाचा निर्णय दिला आहे. घटस्फोटाबाबत हायकोर्टाने महत्त्वाचा निकाल दिला आहे. घटस्फोटाला मंजुरी मिळाली असताना नोकरदार पत्नीकडून बेरोजगार पतीला पोटगी मिळण्याचा मार्ग अखेर मंजूर झाला आहे.या निर्णयामुळे बेरोजगार पतींना दिलासा मिळाला आहे.
नांदेड येथील दिवाणी न्यायालयाने घटास्फोटानंतरही पत्नीने पतीला पोटगी देण्याचा आदेश दिला होता. त्याविरोधात पत्नीने औरंगाबाद हायकोर्टात धाव घेतली होती. औरंगाबाद खंडपीठाने दिवाणी न्यायालयाचा हा आदेश कायम ठेवला. या निर्णयात हस्तक्षेप करण्यास नकार देत पत्नीने दाखल केलेली याचिका फेटाळून लावली. नांदेड येथील घटस्फोटित महिलेने औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती.
असे घडले काही
– पत्नी व पती यांचा विवाह 1992 मध्ये झाला.
-पत्नीने पतीकडून घटस्फोट मिळण्यासाठी नांदेडला केला दिवाणी न्यायालयात अर्ज
– सन 2001 मध्ये न्यायालयाने घटस्फोट मंजूर केला.
– पतीने हिंदू विवाह अधिनियम 1955 च्या कलम 24 आणि 25 अंतर्गत स्थायी पोटगी,
निर्वाह खर्च मिळावा यासाठी दिवाणी न्यायालयात धाव