नवी दिल्ली – राज्यसभेतून निलंबीत करण्यात आलेल्या 12 खासदारांवरील कारवाई मागे घ्या या मागणीवरून आजही विरोधी पक्ष सदस्यांनी राज्यसभेत गदारोळ केल्याने राज्यसभेचे कामकाज आज सकाळच्या सत्रात दोन वेळा करण्यात आले.
आज उपसभापती हरिवंश नारायण सिंह यांनी प्रश्नोत्तराचा तास पुकारल्यानंतर पीयुष गोयल हे सदस्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देण्यासाठी उभे राहिले. त्यावेळी सदस्यांनी गदारोळ सुरू केला. त्यावर गोयल म्हणाले की आम्ही विरोधी पक्षाच्या नेत्यांशी यावर सातत्याने बोलण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांनी माफी मागितली तर त्यांचे निलंबन रद्द केले जाऊ शकते पण ते माफी मागण्यास तयार नाहीत त्यामुळे या प्रकरणात बाधा निर्माण झाली आहे.
आपल्या कृत्याविषयी या सदस्यांना काहीच वैषम्य वाटत नाही ही चुकीची बाब आहे. त्यातून सभागृहाच्या प्रतिष्ठेलाच बाधा येत आहे असे ते म्हणाले. अध्यक्षांनी विनंती करूनही हे सदस्य सभागृहाचे कामकाज सुरळीत करू इच्छित नाहीत हा सभागृहाचाच नव्हे तर संपुर्ण देशाचा अवमान आहे असे पीयुष गोयल यांनी नमूद करताच सभागृहातील गदारोळ आणखीनच वाढला त्यामुळे दुपारी दोन वाजेपर्यंत हे कामकाज तहकुब करावे लागले. त्याच्याही आधी हे कामकाज दुपारी बारा पर्यंत तहकुब करावे लागले होते.