कोहीमा – सुरक्षा दलाच्या जवानांकडून गैरसमजुतीतून झालेल्या गोळीबारात नागालॅंडमध्ये जे 14 जण ठार झाले आहेत त्यांच्या कुटुंबियांनी दोषी जवानांवर कारवाई केल्या शिवाय सरकारकडून दिली जाणारी कोणतीही नुकसानभरपाई न स्वीकारण्याची भूमिका घेतली आहे.
या मृतांच्या कुटुंबियांना राज्याचे मंत्री पी पैवांग कोंकयाग यांच्याकडून 18 लाख 30 हजार रूपयांची नुकसान भरपाई देण्याची घोषणा करण्यात आली आहे. या मृतांच्या कुटुंबीयांना देण्यात येणाऱ्या एकूण नुकसान भरपाईचा हा पहिला हप्ता आहे.
तथापि ही रक्कम स्वीकारण्यास या कुटुंबीयांनी नकार दिला आहे. भारतीय सशस्त्र दलाच्या 21 व्या पॅरा कमांडोच्या अधिकारी आणि जवानांवर आधी कारवाई करा अशी त्यांची मागणी आहे. ओटिंग गावात हा प्रकार घडला तेथील ग्राम पंचायत आणि मृतांच्या कुटुंबीयांनी संयुक्तपणे ही भूमिका मांडली आहे.