कोल्हापूर – पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या प्रमुख मंदिरात’ दर्शनासाठी लागू केलेली ई पासची सक्ती बंद करावी आणि सर्व भाविकांना मोकळेपणाने देवीचे दर्शन घेता यावे या मागणीसाठी भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी (ता.२६ ऑक्टोबर) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली.
‘अंबाबाई मंदिर, जोतीबा मंदिर येथे ई पास ची सक्ती रद्द करा, भाविकांना ई पासच्या बंधनात अडकून ठेवणाऱ्या जिल्हा प्रशासनाचा धिक्कार असो, महाराष्ट्रातील झाली मंदिरे खुले परंतु प.म.देवस्थान समितीचा अद्याप अडमुठेपणा का ? मंदिरे बंदमुळे छोटे व्यापारी बेहाल – प्रशासन मात्र खुशाल’ अशा घोषणा दिल्या. भाजपा शिष्टमंडळाने जिल्हाधिका-यांना निवेदन सादर केले.
भाजपा सरचिटणीस हेमंत आराध्ये, सरचिटणीस गणेश देसाई यांची भाषणे झाली. प्रवक्ते अजित ठाणेकर यांनी कोल्हापूरात घडलेल्या अनेक प्रसंगांचे उदाहरण देत प्रशासनाबद्दल संताप व्यक्त केला. एका बाजूस अंबाबाई आणि जोतिबाच्या दर्शनावर आपण निर्बंध लादलेले असताना अन्य काही धर्मियांच्या गतीविधींकडे प्रशासन जाणूनबुजून कानाडोळा करीत असल्याचे सांगितले.
उपाध्यक्ष संतोष भिवटे, भाजपा सरचिटणीस दिलीप मेत्राणी, माजी नगरसेवक चंद्रकांत घाटगे, विजय खाडे-पाटील, संजय सावंत, राजू मोरे, दिग्विजय कालेकर, आशिष कपडेकर, भरत काळे, सचिन सुतार, धीरज पाटील, दिलीप बोंद्रे, महेश यादव, अनिकेत सोलापुरे, राजाराम परीठ, विशाल शिराळकर, प्रवीणचंद्र शिंदे, अनिकेत मुतगी, महादेव बिरंजे, सचिन साळोखे, इक्बाल हकीम, विराज चिखलीकर, प्रदीप घाटगे, गौरव सातपुते, नरेंद्र पाटील उपस्थित होते.