दुबई – भारताचा पराभव करत टी-20 विश्वकरंडक स्पर्धेतील लढतीत पाकिस्तानने भारताचा पराभव करत नवा इतिहास रचला. मात्र, या पराभवाने हुरळून जाण्याची गरज नाही, असा सल्ला पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने सहकारी खेळाडूंना दिला आहे.
या विजयानंतर सगळेच आनंदात आहे; पण लगेच बेफिकीर होणे परवडणारे नाही. या स्पर्धेत जर विजेतेपद मिळवायचे असेल तर हा विजय मागे पडला असून पुढील सामन्यावर लक्ष केंद्रीत करणे आवश्यक आहे.
आपल्या विजयाचा आनंद तर आहेच; पण या विजयानंतरही काही प्रश्न उभे राहिले आहेत. गोलंदाजी व क्षेत्ररक्षण यांमध्ये अजूनही सुधारणा होऊ शकते, असेही बाबर म्हणाला.
आपल्या ध्येयापासून भटकणे योग्य नाही. आता तर जबाबदारी जास्तच वाढली आहे, असेही बाबर म्हणाला.