हे जळेंवीण बुडविती । आगीवीण जाळिती । न बोलतां कवळिती । प्राणियांतें ।। 257 ।। हे शस्त्रेंविण साधिती । दोरेंविण बांधिती । ज्ञानियासी तरी वधिती । पैज घेउनि ।। 258 ।।
श्री ज्ञानेश्वरी अध्याय तिसरा संत ज्ञानेश्वर माऊली म्हणतात की, हे काम आणि क्रोध मनुष्य प्राण्याला पाण्यावाचून बुडवतात, अग्नीवाचून जाळतात आणि त्याला न कळत पूर्णपणे ग्रासून टाकतात. काम आणि क्रोध कोणत्याही शस्त्राचा आधार न घेता संधी साधून मारतात. ते दोरखंडा शिवाय तुम्हाला बांधू शकतात.
ज्ञानी पुरुषाला देखील प्रतिज्ञा करून ते नष्ट करतात म्हणजे त्यांच्यात देहबुद्धी उत्पन्न करतात. चिखलाचा आधार न घेता ते घट्ट रोऊन बसतात. पाशा वाचून बंधनात अडकवितात. असे हे काम-क्रोध सर्वांच्या देहात गुढरूपाने राहत असल्यामुळे कोणाच्या अधीन होत नाहीत. रजोगुणापासून उप्पन्न होणारा काम आहे आणि तो क्रोधाचे रूप धारण करतो.
म्हणून अशा सर्व भक्षक, महापापी शत्रूपासून सदैव सावध राहा.