पुणे – शेत पिकाला हमीभाव मिळत नाही. तसेच साखर कारखान्याने ऊस बिलाचे पैसे लवकर दिले नाही. यापार्श्वभूमीवर गांजाला चांगला भाव असल्याने मला दोन एकर शेतात गांजाची लागवड करण्याची परवानगी देण्याची मागणी शेतकऱ्याने सोलापूर जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे. जर 15 सप्टेंबरपर्यंत परवानगी द्यावी.
अन्यथा दि.16 सप्टेंबरला जिल्हा प्रशासानाकडून परवानगी मिळाली, असे गृहीत धरून मी गांजाची लागवड करणार करणार असल्याचे शिरापूर ता. मोहोळ येथील शेतकऱ्याने सोलापूर जिल्हा प्रशासनाला दिलेल्या पत्रात म्हटले आहे. याचसह संबधित शेतकऱ्याने माझ्यावर गुन्हा दाखल झाला तर त्याचे जिल्हा प्रशासनच जबाबदार राहिले असे सुध्दा पत्रात म्हटले आहे.
याबाबतचे पत्र सोशल मिडीयावर व्हायरल झाले आहे. गांजाची लागवड मागणी करणाऱ्या शेतकऱ्याचे नाव अनिल आबाजी पाटील आहे. याबाबतचे निवेदन जिल्हा प्रशासनाबरोबरच सोलापूरचे ग्रामीण पोलिस अधिक्षक यांना सुध्दा दिले आहे.