जळगाव – जिल्ह्यासह शहरात करोनाच्या रूग्णांची वाढती संख्या लक्षात घेता पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिलेल्या निर्देशांनुसार जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी शुक्रवार, शनिवार व रविवार असा 3 दिवसांचा जनता कर्फ्यू जाहीर केला आहे.
या 3 दिवसात शहरातील अत्यावश्यक सेवा वगळता बहुतांश बाजारपेठा बंद राहणार आहेत. करोनाची साखळी तोडण्यासाठी शहरातील जनतेने जनता कर्फ्यूचे पालन करावे असे आवाहन गुलाबराव पाटील यांच्यासह प्रशासनाने केले आहे.
शहराच्या हद्दीत 11 मार्च रोजी रात्री 8 पासून जनता कर्फ्यू सुरू होणार आहे. तो 15 मार्च रोजी सकाळी 8 वाजता संपणार आहे. या दरम्यान, आपत्कालीन सेवा वगळता अन्य सेवा बंद राहणार आहेत. या जनता कर्फ्यूसाठी व्यापारी आणि जनतेने सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे.