मुंबई: पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणावरून अनेक गंभीर आरोप असलेले वनमंत्री संजय राठोड यांनी अखेर राजीनामा दिला आहे. राठोड यांच्या राजीनाम्यासाठी भारतीय जनता पक्षानं गेल्या काही दिवसांपासून आक्रमक भूमिका घेतली होती. भाजपच्या महिला नेत्या चित्रा वाघ यांनी देखील आक्रमक पावित्रा घेतला होता. राठोड याच्या राजीनाम्याने महाविकास आघाडीची पहिली विकेट पडल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. तर आता या राजीनाम्यावरून भाजपने पुन्हा एकदा प्रश्न चिन्ह उपस्थित केले आहे.
पत्रकारांशी बोलतांना भाजप नेते संजय कुटे म्हणाले,’ राठोड यांनी राजीनामा दिला मात्र हा राजीनामा अद्यापही राज्यपालांना भेटलेला नाही त्यांच्या राजीनामा राज्यपालांपर्यंत पोहचायला इतका वेळ का लागतोय. राजीनामा मातोश्री नाही तर शिवसेना भवनात फोटो फ्रेम करून ठेवला आहे का ? असा खोचक सवालही त्यांनी या वेळी शिवसेनेला केला .
ते पुढे म्हणाले, त्यांनी लवकरात लवकर हा राजीनामा राज्यपालांकडे द्यावा. जो पर्यंत हा राजीनामा राजपाल मंजूर करत नाही तोवर हा राजीनामा राठोड यांनी दिलाय असं म्हणता येणार नाही. असं म्हणत त्यांनी राठोड यांचा राजीनाम्यावर प्रश्न उपस्थित केले.
तत्पूर्वी, शिवसेना नेते संजय राठोड यांनी वन मंत्रीपदाचा राजीनामा देऊन तीन दिवस उलटले तरी राठोड यांचा अद्याप राज्यपालांकडे पाठवण्यात आलेला नाही. त्यावरून भाजप नेत्यांनी आक्रमक भूमिका घेतली होती.