काही सामान्य माणसे कोणत्याही प्रकारची राजकीय पार्श्वभूमी नसताना केवळ स्वकर्तृत्वाने मोठी होतात. त्याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे बारामती शहरातील ऍड. विनोद जावळे हे आहेत. अडलेल्या नडलेल्यांना, रात्रीबेरात्रीही ऍड. जावळे मदतीसाठी तयार असतात. कधीकधी तर खेड्यातून आलेल्या अशिलांकडे येण्या-जाण्यासाठी भाड्याचे पैसेही नसायचे तेव्हा विचारपूस करून भाड्यासाठी पैसेही द्यायचे. परिसरातील दीनदुबळ्या गरिबाची, गरजू लोकाची मनापासून सेवा केली. यातूनच मानवतावादी वकील म्हणून असलेल्या विश्वासाला ऍड. जावळे पात्र ठरलेत असा “दर्यादिल अवलिया’ या परिसराला लाभला म्हणून कित्येक लोक ऍड. जावळे यांचे मनापासून ऋण व्यक्त करताना दिसतात.
भूतकाळाचे भान, वास्तवाचे ज्ञान आणि भविष्याच विज्ञान जाणणारे ऍड. जावळे अशीही त्यांची एक आगळीवेगळी ओळख परिसरात आहे. यांचे हेच गुण हेरून महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी त्यांना “मनसे’त प्रवेश दिला अन् जावळे यांचा राजकीय प्रवास सुरू झाला. प्रस्थापित विरोधकांच्या साम्राज्यात त्यांनी भक्कमपणे पाय रोवले आहेत. त्यांच्या कामाची दखल राज ठाकरे यांनी घेत त्यांच्याकडे पुणे जिल्हाध्यक्षपदाची धुरा सोपविली. त्यानंतर जावळे यांनी 15 वर्षांत आपल्या कार्यकर्तृत्वाची छाप जनमाणसावर सोडली आहे. मात्र, यात त्यांनी समाजकारणाला कणभरही खंड पडू दिलेला नाही. दैनिक प्रभातच्या वर्धापनदिनानिमित्त त्यांच्या कार्याविषयी उलगडलेला जीवनपट…
चमकदार कामगिरी
2010 मध्ये अचानक पक्षाची जबाबदारी वाढल्यानंतरही ते वकिली व्यवसायात सलग बारा तास काम करतात. सकाळी 9 ते रात्री 9 या कालावधीत ते कार्यालय, कोर्टात काम करतात. बऱ्याचवेळा कामाचा ताण वाढला तर 18 तास काम करतात. बारामती शहरात फौजदारी केसेसमध्ये त्यांनी दबदबा कायम ठेवल्याने त्यांच्याकडे इतर राजकीय पक्षातील नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते न्यायहक्कासाठी आशेने येतात. विरोधी नगरसेवक सुनील सस्ते यांच्या प्रकरणात त्यांना न्याय मिळवून दिला आहे.
बीजेपीचे माजी नगरसेवक आसिफ खान यांच्यावर आठ ते दहा गुन्हे दाखल होते. त्यामध्ये चार ते पाच प्रकरणे त्यांनी निकालात काढली आहेत. नगरसेवक अभिजीत सोनवणे प्रकरणात दिलासा दिला आहे. राष्ट्रवादीचे नगरसेवक नवनाथ ऊर्फ पप्पू बल्लाळ यांच्या प्रकरणात त्यांची सात केसेसमधून निर्दोष मुक्तता केली आहे. मांढरदेवी विषबाधा प्रकरणातील विष्णुपंत चव्हाण प्रकरण त्यांनी पाहिले आहे. इंदापूर येथील बलात्कार प्रकरण त्यांनी हाताळले आहे. या प्रकरणातील आरोपींची त्यांनी निर्दोष मुक्तता केली आहे. राष्ट्रवादीचे विद्यमान नगरसेवक गणेश ऊर्फ भाईजी सोनवणे यांच्या गाजलेल्या खंडणी प्रकरणात त्यांना जामिनावर मुक्तता मिळवून दिली.
वकिली क्षेत्रातील आदर्शवत् कामकाज
जावळे यांचा जामीन मंजूर करण्यात हातखंडा आहे. सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रात त्यांनी झोकून देऊन काम केले आहे. त्यांनी तत्त्वाशी तडजोड केली नाही. उपमुख्यमंत्री अजित पवार, माजीमंत्री विजय शिवतारे, राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याशी त्यांचे मैत्रीपूर्ण संबंध अजातशत्रूची प्रचिती देणारी आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे पाईक होऊन पुरोगामी विचारधारा तळागाळात रुजवण्याचा प्रयत्न केला आहे. ते भारतीय राज्यघटना तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्यावर व्याख्याने देतात. बारामतीमधील वसुंधरा वाहिनीवर त्यांनी कायद्याविषयक शिबिरातून ग्रामीण भागातील जनतेला विविध विषयांवर मार्गदर्शन करीत आहेत. कायद्याचे सखोल अभ्यास म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांनी आतापर्यंत तीन हजार लोकांना जामीन मिळवून दिला आहे. ते कोर्टात सलग आठ ते दहा तास न्यायाधीशासमोर युक्तिवाद करतात. सरकारी वकील प्रसिद्ध कायदेतज्ज्ञ ऍड. उज्ज्वल निकम व त्यांचा मुलगा अनिकेत निकम यांच्याशी त्यांचे कौटुंबिक संबंध जोडले आहे.
सामाजिक, सांस्कृतिक, आरोग्य कार्यक्रमातही पुढाकार
राज प्रतिष्ठानच्या माध्यमातून सामाजिक व सांस्कृतिक आरोग्याबाबत उपक्रमांचे आयोजन केले जाते. वृक्ष संवर्धन तसेच मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण केले जाते. गरजू विद्यार्थ्यांना मदत केली आहे. स्पर्धा परीक्षांसाठी मार्गदर्शन तसेच अभ्यासिकाद्वारे जास्त तास अभ्यास करण्याच्या स्पर्धा देखील भरविल्या जात आहेत. दरवर्षी दहीहंडी उत्सवाच्या माध्यमातून सांस्कृतिक वारसादेखील जोपासला जात आहे. 2010 पासून राज ठाकरे यांच्या नावाने राज प्रतिष्ठानच्या माध्यमातून दहीहंडी उत्सव थाटात आणि जल्लोषात साजरा केला जात आहे. राजकीय-सामाजिक सहकार तसेच सिनेसृष्टीतील सेलिब्रिटी कलाकार, आमदार, खासदार आधी मान्यवरांची मांदियाळी असते.शहरातील नामांकित दहीहंडीपैकी एक म्हणून राज दहीहंडी हा उत्सव लक्षवेधी ठरला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शहरातील रक्तपेढीत रक्ताचा तुटवडा भरून काढण्यासाठी रक्तदान शिबिर आयोजन केले जाते. मराठी भाषा दिनानिमित्त मराठी भाषेसाठी उल्लेखनीय कामगिरी केलेल्या शिक्षण, प्रशासन, वकील क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार गुणगौरव करून त्यांना प्रोत्साहित केले जात आहे.
समाजसुधारकांच्या विचारांचा जागर
समाजसुधारकांच्या विचारांचा जागर सुरू ठेवण्यासाठी बौद्ध युवक संघटनेच्या माध्यमातून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आण्क्यांच्या जयंतीनिमित्त उपक्रम राबविले जात आहेत. संघटनेच्या कोअर कमिटीत सदस्य झाल्यानंतर त्यांनी संघटनेला ऊर्जितावस्था आणली. बारामती तालुक्यात संघटनेच्या शाखा सुरू केल्या. श्री छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांची जयंती साजरी करीत त्यांच्या विचारांचा जागर सुरू केला आहे. तसेच रक्तदान शिबिर, गरिब, गरजू महिलांना साडी वाटप त्यांच्या माध्यमातून सुरू आहे.
ज्युनिअर वकील मुख्य प्रवाहात
ऍड. जावळे यांनी मनसेच्या माध्यमातून काम करताना सामाजिक बांधिलकी कधीही ढळू दिली नाही. त्यांच्या बारामतीत येथील कार्यालयात 12 ज्युनिअर वकील काम करीत आहेत. त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचे काम केले आहे. ज्युनिअर वकिलांना. आर्थिक हातभार तर लावलाच व परीक्षेसाठी मार्गदर्शन केले. त्यातील दोघांची न्यायाधीशपदी नियुक्ती झाली आहे. त्यामुळे जावळे यांनी खऱ्या अर्थाने त्यांना न्यायदानाच्या मुख्य प्रवाहात आणून ज्ञानज्योत तेवत ठेवली आहे.
कौटुंबिक पार्श्वभूमी
आजोबा आप्पासाहेब जावळे हे माळेगाव पाटबंधारे विभागात काम करीत होते. आजी राधाबाई जावळे यांच्या विचारांचा विशेष प्रभाव त्यांच्यावर होता. घरची कौटुंबिक पार्श्वभूमी तीन पिढ्यांपासून प्रशासनाशी निगडित आहे. वडील हनुमंतराव जावळे पोलीस उपनिरीक्षक होते. त्यामुळे घरात ऍड. जावळे यांना शिस्तीचे धडे मिळाले. सामाजिक चळवळ आणि वकिली व्यवसायात कार्यरत असताना कौटुंबिक साथ त्यांच्यासाठी मोलाची ठरली आहे. त्यांच्या आईचे जुनी सातवीपर्यंत शिक्षण झाल्याने त्यांनी वाचन संस्कृती घरात रूजवली होती. त्यांच्यावर बालपणातच संस्कार रुजले होते.
भाऊ सुहास जावळे, दाजी मिलिंद काकडे (विशेष लेखापरीक्षण वर्ग 1 सहकार विभाग), दाजी संदीप कांबळे (प्रगतशील बागायतदार) पत्नी सौ. मोनिका जावळे, बहीण सौ. जयश्री काकडे, सौ. राजश्री कांबळे, मेव्हणे योगेश घोडके (वनपरीक्षेत्र अधिकारी ओतूर), चुलते पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत जावळे यांचा पाठिंबा कायम असतो. आई विमल, पत्नी सौ. मोनिका, मुलगा विराज, मुलगी मानसी असे पंचकोनी कुटुंब आदर्शवत ठरले आहे. कौटुंबिक जबाबदारी पत्नी मोनिका जावळे पार पाडत आहेत, असे ते अभिमानाने सांगतात.
समाजकारण आणि राजकारणातील त्यांची केमिस्ट्री जुळून आल्यानंतर ऍड. जावळे यांचे काम बहरत होते. स्वतः राज ठाकरे यांनी त्यांच्या कामाची दखल घेतली. पुणे येथील सभेत जिल्हाध्यक्ष पदासाठी ऍड. विनोद जावळे यांचे नाव जाहीर केले. 2016 मध्ये त्यांची जिल्हाध्यक्षपदी निवड केली. बारामती, दौंड, इंदापूर, पुरंदर, हवेली तालुक्याचा कार्यभार सोपविला. पुणे जिल्ह्यातून काही लोक समस्या मांडण्यासाठी मनसे कार्यालयात गेल्यानंतर मुंबई कार्यालयातून पीडित लोकांना जावळे यांचा रेफरन्स दिला जातो. इतकी विश्वासार्हता त्यांनी निर्माण केली आहे. 2019 मध्ये विधानसभा निवडणुकीत ऍड. जावळे यांना मनसेची उमेदवारी जाहीर झाली होती. मात्र, अजित पवार आणि राज ठाकरे यांच्यात चर्चा झाल्यानंतर मनसेने जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या उमेदवारांना पाठिंबा देत राष्ट्रवादीच्या मागे ताकद उभी केली.
त्यांनी जिल्हाभर दौरे करताना इतर तालुक्यातील पदाधिकारी, मनसैनिकांना मार्गदर्शन करीत बळ दिले. मनसे नेता अमित ठाकरे, नेता बाळा नांदगावकर आणि नेता राजेंद्र ऊर्फ बाबू वागस्कर, सरचिटणीस रिटाताई गुप्ता, प्रदेश उपाध्यक्ष विजयदादा तळवळकर, नेता अविनाश अभ्यंकर, अनिल शिदोरे, मनसे पुणे शहर महिला अध्यक्षा रूपालीताई पाटील, नेता नितीन सरदेसाई, सरचिटणीस शिरीष सावंत यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळत असल्याने त्यांनी 15 वर्षांत राजकीय पटलावर मोठी झेप घेतली आहे. किशोर शिंदे (कोथरूड), बाळाभाऊ भेगडे, शहराध्यक्ष अजय शिंदे, प्रदेश उपाध्यक्ष गणेश सातपुते, सरचिटणीस वसंततात्या मोरे, दौंड तालुकाध्यक्ष सचिन कुलथे, विद्यार्थी सेना संदीप बोराडे, पुरंदरचे अध्यक्ष उमेश जगताप, सासवड शहराध्यक्ष महेंद्र जगताप, इंदापूर राजेंद्र हजारे (पुणे जिल्हा उपाध्यक्ष), तालुकाध्यक्ष अविनाश माने, जिल्हा सचिव रामभाऊ काळे, बारामती शहराध्यक्ष ऋषिकेश पवार, शहर उपाध्यक्ष चंद्रकांतदादा भोसले, तालुकाध्यक्ष निलेश वाबळे, कामगार सेना तालुकाध्यक्ष निलेश कदम, बांधकाम कामगार सेनेचे तालुकाध्यक्ष रोहिदास धोत्रे, तालुका संघटक.
सागर गायकवाड, जिल्हा सचिव मयूर जाधव, बारामती तालुका मनविसे शुभम भंडारे आदी कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांच्या बळावर मनसेचे काम सुरू आहे. ऍड. जावळे यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली बारामतीत अर्धनग्न मोर्चा काढला होता. मनसेच्या माध्यमातून टोलनाक्यावर आंदोलन केले होते. जावळे यांनी गेल्या 15 वर्षांत राजकीय क्षेत्रात मोठा लौकिक मिळवला आहे. यातून त्यांनी समाजाप्रती भान जोपासले आहे. पुणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत मनसेचे उमेदवार रूपालीताई ठोंबरे पाटील यांच्या प्रचाराची धुरा त्यांनी सांभाळली होती.
शब्दांकन – प्रमोद ठोंबरे