मुंबई – काही ठिकाणी निर्बंध पाळत तर काही ठिकाणी मोठ्या उत्साहात नव्या वर्षाचं स्वागत करण्यात आलं. करोना महामारीमुळं देशातील अनेक शहरात नाईट कर्फ्यू होता. मात्र गोवा, पाटणा, भोपाळसारख्या अनेक शहरांत लोकांनी रस्त्यावर उतरुन जल्लोषात स्वागत केल्याचं पाहायला मिळालं. करोनाच्या नव्या प्रकाराची भारतात एन्ट्री झाल्यानं सरकारनं नव्या वर्षाच्या सेलिब्रेशनवर कडक निर्बंध घातले होते.
केंद्र सरकारनं सर्व राज्य सरकारांना नवीन वर्षाच्या या स्वागताच्या जल्लोषावर आणि गर्दीवर नियंत्रणासंदर्भात कडक निर्बंध घालण्याबाबत निर्देश दिले होते. या पार्श्वभूमीवर मुंबईत कलम 144 लागू करण्यात आलं. मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया, जुहू बीच आणि समुद्र किनाऱ्यांवर गर्दी करण्यावर निर्बंध घालण्यात आले आहेत.
मुंबई वाहतूक पोलिसांकडून 31 डिसेंबरच्या रात्रीसाठी परिपत्रक जारी करण्यात आलं होतं. दिल्लीमध्ये देखील नाईट कर्फ्यूची घोषणा करण्यात आली होती. तर उत्तर प्रदेश, राजस्थान, कर्नाटक, छत्तीसगड, बिहार, मध्य प्रदेश राज्य सरकारांनी देखील नवीन वर्षाच्या जल्लोषावर निर्बंध घातले होते.
मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया, जुहू बीच आणि समुद्र किनाऱ्यांवर गर्दी करण्यावर निर्बंध घालण्यात आले होते. दरवर्षी ड्रिंक अँड ड्राईव्हमध्ये ब्रीथ ऍनालायझरने मद्यपान केलं आहे की नाही याची चाचणी केली जात होती. मात्र यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ब्लड टेस्ट करून चालकाने मद्यपान सेवन केलं आलं आहे की नाही याची तपासणी करण्यात आली.
रात्री 2 वाजेपर्यंत ड्रिंक अँड ड्राईव्हमध्ये 20 जणांवर कारवाई केल्याची माहिती आहे. कोरोनाची सध्याची परिस्थिती लक्षात घेता मद्यपानाचे सेवन करून गाडी चालवणाऱ्यांची रक्त चाचणी केली जाणार आहे आणि जर त्यांनी मद्यपानाचे सेवन केलं असेल तर त्यांच्यावर मोटर व्हेईकल ऍक्ट नुसार कारवाई करण्यात येणार आहे. तसेच गाडीत असणाऱ्या सहप्रवाशांविरुद्ध सुद्धा पेंडमिक ऍक्टनुसार कारवाई केली जाईल.