नवी दिल्ली – महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ आणि गुजरातमध्ये सध्या पावसाने हाहाकार माजला असून सगळीकडे पुरस्थिती पहायला मिळत आहे. या परिस्थीतीचा सामना करण्यासाठी केंद्रसरकारकडून 83 एनडीआरएफची पथक मदतीसाठी रवाना करण्यात आली आहेत.
यासंदर्भात बोलताना केंद्रीय राज्यमंत्री नित्यानंद राययांनी सांगितले की, चार राज्यांमध्ये पावसामुळे प्रचंड हाहाकार माजला असून केंद्राने आपत्ती व्यवस्थापन करण्यासाठी 83 एनडीआरफची पथक या भागांकडे रवाना केली असून ही पथक सर्व आवश्यक साधन सामग्रीं सहीत संपन्न आहेत. त्याच बरोबर या भागांमध्ये आधीपासूनच लष्कर, नेव्ही, एअर फोर्स आणि तटरक्षक दलाच्या 173 तुकड्या कार्यरत आहेत.
पाठवण्यात आलेल्या तुकड्यांमधील एका टीममध्ये 45 सदस्य असतील असेही त्यांनी यावेळी सांगितले. तसेच आतापर्यंत या भागामधून 82 हजार लोकांना सुरक्षीत स्थळी हलवण्यात आले असून 2 हजार 325 लोकांना वाचवण्यात यश आल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले आहे.