नवी दिल्ली – पाकिस्तानी तुरुंगांमध्ये सध्या 577 भारतीय मच्छीमार कैदेत आहेत. त्याशिवाय, भारतीय मच्छीमारांच्या 1 हजार 164 नौका पाकिस्तानच्या ताब्यात आहेत.
संबंधित माहिती परराष्ट्र राज्यमंत्री व्ही. मुरलीधरन यांनी शुक्रवारी लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासावेळी दिली. मच्छीमारांचा मुद्दा भारताकडून सातत्याने पाकिस्तानपुढे उपस्थित केला जातो. त्या मुद्द्याकडे मानवतावादी आणि उपजीविकेच्या दृष्टिकोनातून पाहिले जावे अशी भारताची भूमिका आहे.
मच्छीमारांच्या सुटकेसाठी भारताकडून सातत्यपूर्ण प्रयत्न केले जातात. त्या प्रयत्नांमुळे 2014 या वर्षापासून 2 हजार 140 भारतीय मच्छीमारांची पाकिस्तानातून सुटका झाली. भारतीय मच्छीमारांच्या सुरक्षेला आणि कल्याणाला सरकार
सर्वोच्च प्राधान्य देते, असेही त्यांनी नमूद केले.