नगर, (प्रतिनिधी) – लोकसभेच्या अहमदनगर व शिर्डी मतदारसंघासाठी गुरूवारपासून उमेदवारी अर्ज भरण्यास प्रारंभ झाला असून पहिल्याच दिवशी अहमदनगर लोकसभा मतदारसंघासाठी दुपारी दोन वाजेपर्यंत २३ जणांनी ४२ अर्ज नेले. त्यात महायुतीचे उमेदवार खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्यासाठी अभिजीत दिवटे यांनी दोन अर्ज नेले आहेत. पहिल्या दिवशी एकही अर्ज दाखल झाला नाही.
यामध्ये अभिजित दिवटे यांनी भाजपचे उमेदवार डाॅ. सुजय विखे यांच्यासाठी २ अर्ज नेले आहेत. रावसाहेब शंकर काळे यांनी स्वत: साठी एक अर्ज, अनिल गणपत शेकरकर रा. सिद्धीबाग, सुभाष बन्सी अल्हाट रा. पिंपळगाव उज्जेणी, काशिनाथ बहेरू पोपळघट दोन अर्ज,अशोक भानुदास तांबे, यांनी दोन अर्ज, राणु साहेबराव दळवी यांनी दोन अर्ज, विलास सावजी लाकुझोडे श्रीगोंदा यांनी दोन अर्ज, शिवाजी वामनराव डपाळे नेवासा,
दोन अर्ज, तुकाराम कोकरे रा.श्रीगोंदा दोन अर्ज, अमोल दिंगंबर गुलदगड रा. राहुरी, यांनी प्राजक्त प्रसादराव तनपुरे यांच्यासाठी ४ अर्ज नेले आहेत. शिरीष तुकाराम जाधव रा. दिल्लीगेट यांनी १ अर्ज, दत्तात्रय आप्पासाहेब वाघुंडे रा. साकत यांनी एक अर्ज, अशोक दामोदर ढोकणे रा. उंबरे यांनी एक अर्ज, सुदर्शन लक्ष्मण शिणेळे श्रीरामपुर यांनी दोन अर्ज,
सुधीर वैरागर रा. घोडेगाव यांनी १ अर्ज, मंगल विकास भुजबळ नगर् यांनी एक अर्ज, छगन भिकाजी पानसरे नेवासा यांनी ४ अर्ज, द्न्यानदेव कारभारे पाडळे नेवासा यांनी ४ अर्ज, संजय पांडुरंग अडोळे यांनी २ अर्ज, यशंवत राया म्हस्के श्रीरामपूर यांनी स्वत: साठी २ अर्ज नेले.
गेल्या काही दिवसांपासून लोकसभा निवडणुकीचे रणांगण तापले आले. महायुतीकडून विद्यमान खासदार सुजय विखे पाटील यांना उमेदवारी जाहीर केली आहे. तर महाविकास आघाडीकडून आमदार नीलेश लंके यांना उमेदवारी जाहीर केलेली आहे. उमेदवारी जाहीर होण्याच्या अगोदरपासून विखे-लंके यांच्या वाकयुद्ध पहावयास मिळत आहे. तर दोघांनीही मतदारसंघ पिंजून काढला आहे. २५ एप्रिलपर्यंत उमेदवारी अर्ज स्विकारलेे जाणार आहेत.