नवी दिल्ली – आसामात मनमानी पद्धतीने मतदार संघांची पुनर्ररचना केली जात असून त्या प्रक्रियेला कॉंग्रेस सह अन्य 11 राजकीय पक्षांनी विरोध दर्शवला आहे. कॉंग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी म्हटले आहे की या प्रक्रियेला व्यापक सहमती आणि मान्यता आवश्यक आहे. त्यांना एकतर्फी पद्धतीने ही पुनर्ररचना करता येणार नाही. या प्रकाराच्या विरोधात 11 राजकीय पक्षांचे नेते जंतरमंतरवर धरणे धरणार आहेत आणि नंतर निवडणूक आयोगाला निवेदन सोपवणार आहेत. विरोधी पक्षनेत्यांनी गुरुवारी संध्याकाळी कॉंग्रेस अध्यक्षांची भेट घेतली आणि मतदार संघांच्या पुनर्ररचनेला विरोध दर्शवला.
20 जून रोजी जारी करण्यात आलेल्या सूचनेत निवडणूक आयोगाने आसाममधील विधानसभेच्या जागांची संख्या 126 आणि लोकसभा मतदारसंघांची संख्या 14 वर ठेवण्याचा प्रस्ताव दिला आहे आणि त्या मतदार संघांची फेररचना करण्याचे योजले आहे. काहीं मतदार संघ रद्द करून त्या जागी नवीन मतदार संघ प्रस्तावित करण्यात आले आहेत. या प्रस्तावाला विरोध करणाऱ्या राजकीय पक्षांमध्ये भाजपला पाठिंबा देणाऱ्या काही मित्र पक्षांचाही समावेश आहे.