पुणे – इयत्ता दहावीच्या परीक्षेत राज्यातील तब्बल 66 हजार 578 विद्यार्थ्यांना 90 टक्के पेक्षा अधिक गुण मिळाले आहेत. 4 लाख 89 हजार 455 विद्यार्थ्यांनी 75 टक्केपेक्षा अधिक गुण मिळवत प्रावीण्यासह प्रथम श्रेणीत स्थान मिळविले आहे. त्यामुळे दहावीच्या परीक्षेच्या निकालात यंदाही गुणांचा फुगवटा कायम राहिल्याचे चित्र आहे. तर 5 लाख 26 हजार 210 विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. दरम्यान, हा निकाल पाहता अकरावीच्या प्रवेशासाठी मोठी स्पर्धा निर्माण होण्याची चिन्हे आहेत.
33,306 विद्यार्थ्यांना “एटीकेटी’ची संधी
राज्यातील एक किंवा विषयात नापास झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये मुंबई-7 हजार 996, तर सर्वात कमी कोकण विभागातील 251 विद्यार्थ्यांचा समावेश आहे. या विद्यार्थ्यांना इयत्ता अकरावीला प्रवेश घेता येणार आहे. मात्र, यांना विद्यार्थ्यांना पुरवणी परीक्षा द्यावी लागणार आहे.
95 विद्यार्थ्यांचे निकाल रोखले
राज्यातील 95 विद्यार्थ्यांचे निकाल विविध कारणांनी रोखून ठेवण्यात आलेले आहेत. यात प्रामुख्याने उत्तरपत्रिकेतील पाने फाडणे, कॉपी करणे, उत्तरपत्रिका तपासणाऱ्यांना धमकी देणे यासह अन्य काही कारणांचा समावेश आहे. यातही मुंबईतील सर्वाधिक 67 विद्यार्थ्यांचा समावेश आहे. पुणे विभागात 1, नागपूरमध्ये 2, औरंगाबादमध्ये 25 विद्यार्थ्यांही त्यात समाविष्ट आहेत. मुंबई विभागातील 3 विद्यार्थ्यांना डीबार करण्यात आले आहे.
परीक्षेतील गैरप्रकार (विभागनिहाय)
पुणे- 56, नागपूर-37, औरंगाबाद- 103, मुंबई-32, कोल्हापूर-8, अमरावती-27, नाशिक-70, लातूर-31, कोकण-1 याप्रमाणे विभाग निहाय गैरप्रकार उघडकीस आले आहेत. राज्यात 116 विद्यार्थ्यांना कॉपी करताना पडकले आहे. यात नाशिक विभागात सर्वाधिक 33 कॉपीची प्रकरणे सापडली आहेत.
विद्यार्थी आणि गुणांचे प्रमाण
1 लाख 9 हजार 344 – 85 ते 90 टक्के
1 लाख 46 हजार 961 – 80 ते 85 टक्के
1 लाख 67 हजार 384 – 75 ते 80 टक्के
1 लाख 75 हजार 667 – 70 ते 75 टक्के
1 लाख 73 हजार 300 – 65 ते 70 टक्के
1 लाख 81 हजार 124 – 60 ते 65 टक्के
3 लाख 41 हजार 390 – 45 ते 60 टक्के
95 हजार 469 – 45 टक्क्यांपेक्षा कमी
पुनर्परीक्षार्थी विद्यार्थ्यांचा निकाल
तपशील मुले मुली एकूण
नोंदणी – 24029 – 13675- 37704
प्रविष्ट – 23389 – 13259 – 36648
उत्तीर्ण – 13412 – 8908 – 22320
टक्केवारी – 576.34 – 67.18 – 60.90