मुंबई – शालेय शिक्षण विभागातर्फे इयत्ता दहावी आणि इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी पुन्हा एकदा विषयनिहाय तासिकांचे डीडी सह्याद्री वाहिनीवर आयोजन करण्यात आले आहे. यासंदर्भात ट्विट करून शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी माहिती दिली आहे. या तासिका 15 मार्चपासून सुरू होणार आहेत.
इयत्ता दहावीच्या तासिकांचे वेळापत्रक –
सोमवार – 12:30 ते 1:00
मंगळवार ते शुक्रवार – 12:30 ते 1:00 आणि 1:30 ते 2:00
इयत्ता बारावीच्या तासिकांचे वेळापत्रक –
सोमवार ते शुक्रवार – 2:30 ते 3:30
इयत्ता निहाय व विषय निहाय दैनंदिन वेळापत्रक www.maa.ac.in या संकेतस्थळावर उपलब्ध होणार आहे. अशी माहिती शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.
शालेय शिक्षण विभागातर्फे इ. १० वी व इ. १२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी पुनश्च एकदा विषयनिहाय तासिकांचे आयोजन डी. डी. सह्याद्री वाहिनीवर दि.१५ मार्च २०२१ पासून सुरू होत आहे. सविस्तर वेळापत्रक https://t.co/oJL8Z8mIoM येथे उपलब्ध आहे. @CMOMaharashtra @AjitPawarSpeaks @scertmaha pic.twitter.com/t9XTrjwG9z
— Prof. Varsha Eknath Gaikwad (@VarshaEGaikwad) March 13, 2021
दरम्यान, काही दिवसांपूर्वी बोर्डाकडून दहावी-बारावीच्या परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. यानुसार माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र म्हणजे इयत्ता 10 वीची परीक्षा 29 एप्रिल 2021 ते 20 मे 2021 या कालावधीत होणार आहे. तर उच्च माध्यमिक प्रमाणपत्र म्हणजेच 12 वीची परीक्षा 23 एप्रिल 2021 ते 21 मे 2021 या कालावधीत होणार आहे. महाराष्ट्र बोर्डाच्या अधिकृत संकेतस्थळावरही 16 फेब्रुवारी 2021 पासून वेळापत्रक उपलब्ध करून देण्यात आले आहे.