कोलकाता : कोलकात्याचे माजी पोलिस आयुक्त राजीवकुमार यांचा अटकपुर्व जामीन अर्ज कोलकाता उच्च न्यायालयाने मंजुर केल्याने त्यांना आता सीबीआयच्या अटकेच्या कारवाईपासून दिलासा मिळाला आहे.
चिटफंड घोटाळ्यातील आरोपींना पाठिशी घालण्याचा प्रयत्न राजीवकुमार यांनी केल्याचा सीबीआयचा आरोप आहे. त्यासाठी त्यांना ताब्यात घेण्यासाठी सीबीआयचे पथक नुकतेच पश्चिम बंगाल मध्ये येऊन गेले होते. पण त्यांना ते सापडू शकले नव्हते. राजीवकुमार हे सध्या पश्चिम बंगालचे अतिरीक्त पोलिस महासंचालक आहेत. मात्र त्यांना अटकपुर्व जामीन अर्ज मंजुर करताना त्यांनी गरजेनुसार सीबीआयपुढे चौकशीसाठी हजर राहण्याची सुचनाहीं कोर्टाने त्यांना केली आहे. राजीवकुमार यांना कस्टडीत घेऊन चौकशी करण्याची ही केस नाहीं त्यांना चौकशीला बोलावूनही त्यांची चौकशी केली जाऊ शकते त्यामुळे त्यांना अटक करण्याची गरज नाही असे कोर्टाने म्हटले आहे.