पुणे : कोथरुडमधून लोकसभा निवडणुकीत विक्रमी मतदान घेणाऱ्या इंग्रीसह बापट यांच्यावर म्हसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांना निवडून आणण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. एका बाजूला मनसे-कांग्रेस राष्ट्रवादीका झकच उमेदवार दुसऱ्या बाजूला ब्राम्हण महासंघाने उघड विरोधाची भूमिका यामुळे कोथरूडच्या निवडणुकीत चुरस निर्माण झाल्याचे चित्र आहे.
या पाश्र्वभूमीवर कोणताही धोका पत्करायला भाजप तयार नाही. त्यामुळे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी खासदार गिरीश बापट यांना याकडे ‘जाती’नं लक्ष घालायला धाडलं आहे. कोथरुड विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर झाल्यापासून चंद्रकांत पाटलांसमोरील अडचणीत वाढ होत आहे.
या मतदारसंघातून बापट यांना लोकसभेच्यावेळी तब्ब्ल लाखाचे मताधिक्य होते. त्यामुळे चंद्रकांत पाटीलांना भरघोस मताधिक्याने निवडून आणण्याची जबाबदारी आता बापटांना पार पाडावी लागणार आहे. ते यात ब्राम्हण महासंघाचा पाठिंबा कसा मिळवतात.
प्रदेश कार्यालय सचिव मुकुंद कुलकर्णी यांनी बापटांना याबाबतचे पत्र दिले आहे. चंद्रकांत पाटलांच्या नावाला कोथरुडमधील ब्राह्मण महासंघाने विरोध दर्शवला आहे. हा विरोध हाणून पाडण्यासाठी भाजपने गिरीश बापटांना मैदानात उतरवल्याचं बोललं जातंय.