मंचर -सरसकट सर्वच दिव्यांग बांधवांना आर्थिक मदतीची गरज असून जिल्हा परिषदेने आर्थिक सहाय्य करणे गरजेचे आहे.
राज्य शासनाच्या धोरणानुसार व दिव्यांग कायद्याच्या अनुषंगाने एखादी व्यक्ती 40 टक्के प्रमाणापेक्षा जास्त दिव्यांग असेल. तर त्या दिव्यांग व्यक्तीला लाभापासून वंचित ठेवू नये. सद्यस्थितीत 60 टक्केपेक्षा दिव्यांग बांधवांना निर्वाह भत्ता म्हणून मासिक 1 हजार रुपये जिल्हा परिषद दिव्यांग 5 टक्के निधीतून खर्च करीत आहे.
त्यामुळे 40 ते 59 टक्के असलेल्या जिल्ह्यातील 28 हजार दिव्यांग व्यक्तींना जिल्हा परिषदेच्या निर्वाह भत्ता योजनेपासून वंचित राहावे लागत आहे. सर्व दिव्यांग व्यक्तींना रेशनिंग धान्य उपलब्ध करून द्यावे. अशी मागणी दीपक ढोबळे यांनी केली.