मुंबई: गुरुग्राम येथे एका मुस्लीम तरुणाची टोपी काढून त्याला मारहाण करण्यात आली. या पार्श्वभूमीवर प्रतिक्रिया व्यक्त करताना राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी मोदी सरकारवर टीका केली आहे.
सबका साथ, सबका विकास असे मोदी म्हणतात खरे, पण त्यांच्या कार्यकाळात अल्पसंख्याकांवर हल्ले होत आहेत. मोदी यांच्या कथनीत आणि करणीत मोठी तफावत आहे. अशा समाजकंटकांवर काय कारवाई होणार हे स्पष्ट झाले पाहिजे, अशी मागणीही मलिक यांनी केली आहे.
सबका साथ, सबका विकास असे @narendramodi म्हणतात खरे, पण त्यांच्या कार्यकाळात अल्पसंख्याकांवर हल्ले होत आहेत. मोदी यांच्या कथनीत आणि करणीत मोठी तफावत आहे. अशा समाजकंटकांवर काय कारवाई होणार हे स्पष्ट झाले पाहिजे, अशी मागणीही @nawabmalikncp यांनी केली आहे. @PMOIndia @BJP4India
— Nationalist Congress Party – Sharadchandra Pawar (@NCPspeaks) May 27, 2019