पाटणा – बिहारमध्ये राष्ट्रीय लोकशाही आघाडी अर्थात “एनडीए’ एकसंध आहे, असे स्पष्टिकरण बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी दिले आहे. राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांच्या वक्तव्यानंतर संयुक्त जनता दलातील कार्यकर्त्यांच्या मनात निर्माण झालेला संभ्रम दूर करण्यासाठी त्यांनी हे स्पष्टिकरण दिले आहे.
“एनआरसी’ आणि “एनपीआर’च्या अंमलबजावणीविरोधात बिहारच्या विधानसभेमध्ये एकमताने ठराव करण्यात आला आहे. “सीएए’ बाबत संयम बाळगला जावा. यासंदर्भातील प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. त्यामुळे विषयाबाबत कोणताही वाद निर्माण व्हायला नको, असे नितीश कुमार यांनी म्हटले आहे.
बिहार विधानसभा निवडणुकीत “एनडीए’ 200 हून अधिक जागा जिंकेल, याचा संकल्प करण्याचे आवाहनही नितीश कुमार यांनी “जेडियु’च्या कार्यकर्त्यांना केले.
989 च्या भागलपूर दंगलीबाबत नितीश कुमार यांनी कॉंग्रेस-आरजेडी युतीलाही फटकारले. 2005 मध्ये आपले सरकार सत्तेत आल्यानंतरच दोषींवर कारवाई केली गेली आणि पीडितांना न्याय मिळाला, याकडे त्यांनी लक्षात आणून दिले.