पिंपरी : पिंपरी राखीव मतदारसंघात आता शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सरळ लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी तब्बल १३ जणांनी माघार घेतली.
राष्ट्रवादी काँग्रेसचे शेखर ओव्हाळ, नगरसेविका सुलक्षणा धर, नगरसेवक राजू बनसोडे, काँग्रेसचे मनोज कांबळे, सुंदर कांबळे, भाजपाचे अमित गोरखे, भीमा बोबडे, आरपीआयच्या (आठवले गट) चंद्रकांता सोनकांबळे यांका माघार घेणाऱ्या उमेदवारांमध्ये समावेश आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसने ऐनवेळी उमेदवार बदलला. त्यामुळे या मतदारसंघातील लढतींकडे सर्वांचे लक्ष्य लागून होते. उमेदवारी माघारीनंतर या मतदारसंघातील लढतीचे चित्र स्पष्ट झाले आहे. शिवसेनेचे अॅड. गौतम चाबुकस्वार व राष्ट्रवादीचे अण्णा बनसोडे यांच्या सरळ लढत होणार असल्याचे चित्र आहे.