कोल्हापूर : केवळ हिंदुत्ववादाचा विचार देशासाठी घातक असून सर्व धर्मियांचा सन्मान करणे गरजेच आहे, असे शरद पवार यांनी म्हटले. तसेच पक्षांतर्गत असणारी नाराजी सोडून आपण सर्वांनी निवडणुकीला समोर जावे आणि यशच मिळवायचे, असा निर्धारही यावेळी पवारांनी व्यक्त केला.
शरद पवारांनी कोल्हापूरातील महाघाडीच्या नेत्यांची आज बैठक घेतली. या बैठकीला माजी खासदार राजू शेट्टी, माजी गृहराज्यमंत्री आमदार सतेज पाटील, राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष हसन मुश्रीफ, प्रदेश कॉंग्रेसचे उपाध्यक्ष पी एन पाटील यांच्यासह आघाडीतील उमेदवार उपस्थित होते. यावेळी झालं गेलं विसरून एक दिलाने काम करण्याचा सल्ला पवारांनी नेत्यांना दिला.
सरकारला जनतेशी देणेघेणे नसून फक्त हिंदुत्व हाच अजेंडा असल्याची टीका त्यांनी यावेळी केली.एकेकाळी पश्चिम महाराष्ट्र आणि कोल्हापूर हा आघाडीचा बालेकिल्ला होता. मात्र हा बालेकिल्ला पूर्ण ढासळल्याने शरद पवार पुन्हा दुरुस्तीच्या कामाला लागले आहेत. आपल्यातील सर्व नाराजी बाजूला ठेऊन कामाला लागा. तसेच शाहू नगरीतून वेगळ्या विचाराच्या शक्ती मोठ्या होतात याचा धक्का बसतो. त्यामुळे आता इथल्या विचारांशी ते सुसंगत नाही, त्यामध्ये आता बदल करायचा आहे. प्रत्येक उमेदवार आपला समजा आणि इथं पुरोगामी विचारांशी तडजोड होत नाही हे दाखवून द्या, असेही पवार यांनी म्हटले.
केवळ हिंदुत्ववादाचा विचार देशासाठी घातक असून सर्व धर्मियांचा सन्मान करणे गरजेच असल्याचेही यावेळी शरद पवार यांनी म्हटले. तसेच पक्षांतर्गत असणारी नाराजी सोडून आपण सर्वांनी निवडणुकीला समोर जायचं आणि यशच मिळवायचे असा निर्धारही यावेळी पवारांनी केला. कोल्हापूरातील विचार आम्ही देश आणि देशाबाहेर मांडतो. पण गेल्या निवडणुकीत पुरोगामी विचार सोडून दुसरी शक्ती वाढली. तसेच या निवडणुकीत एकजुटीने प्रयत्न केले तर यश मिळेल आणि बदलांमध्ये कोल्हापूरवासीय सहभागी होतील, असा विश्वास असल्याचे पवारांनी व्यक्त केला.