पाबळ- सध्या कोरोनाचे सावट सगळीकडेच घट्ट होत आहे. त्यामुळे अनेक उद्योगधंदे बंद पडले आहेत. तेथे काम करणारे मजूर पोरके झाले आहेत. त्याचमुळे त्यांनी आपल्या घराचा रस्ता निवडला आहे.
गेले अनेक दिवस झाले देशात लाॅकडाऊन सुरु आहे. त्यामुळे परप्रांतीयांना घरी परतण्यासाठी काही वाहनांची सेवा उपलब्ध नाही आहे. त्यामुळे अनेक परप्रांतीयांनी चालत जाण्याचा मार्ग स्विकारला आहे. पुण्या आजुबाजुच्या गावांमध्ये अनेक मजूर वास्तव्य करतात. त्यांना सुखरुप त्यांच्या राज्यात पोहचवण्याची जबाबादारी प्रशासनाने घेतली आहे. त्यांच्यासाठी बससेवा उपलब्ध केली आहे.
आमच्या भागात म्हणजेच पुणे-चाकण ते आळे फाटा या परिसरात एकही मजुर पायी चालत दिसणार नाही याची जबाबदारी परिवहन अधिकारी अजय कराळे यांनी घेतली आहे.
महाराष्ट्राने आम्हाला पदरात घेतलं अनेक वर्ष आम्हाला पोसलं. मात्र कोरोनामुळे आम्हाला महाराष्ट्र सोडून जावं लागत आहे. मात्र याही परिस्थितील येथील प्रशासनाने आमची नीट काळजी घेतली. आम्ही महाराष्ट्राचे नेहमी आभारी असू अशी प्रतिक्रिया परप्रांतीयांनी दिली आहे.