मुंबई : आतापर्यंत हाती आलेल्या कलनुसार भारतीय जनता पक्ष- शिवसेना युती पुन्हा सत्तेवर येईल, असे चित्र आहे. मात्र राज्यातील जनतेने भाजपाला एकहाती बहुमत दिले नसल्याचेही स्पष्ट होत आहे. दरम्यान राज्याचे लक्ष लागलेल्या सातारा लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीच्या श्रीनिवास पाटील यांनी ८१ हजार मतांनी आघाडी घेत विजयाकडे वाटचाल सुरु केली आहे.
राज्यात भाजपा 98 तर शिवसेना 60 जागांवर आघाडीवर आहे. कॉंणग्रेसने 40 तर राष्ट्रवादीने 53 जागांवर बहुमताकडे वाटचाल सुरू केली आहे. वंचित बहुजन आघाडी केवळ एका जागेवर आघाडीवर आहे.
पश्चिम महाराष्ट्रात कॉंग्रेसपेक्षा राष्ट्रवादीची स्थिती अधिक भक्कम असल्याचे चित्र आहे. सोमावरी राज्यात 61.13 टक्के मतदान झाले होते. त्यात युती 158 जागांवर तर कॉंग्रेस आघाडी 93 जागांवर आघाडीवर असल्याचे प्राथमिक चित्र आहे.
भाजपाचे चंद्रकांत पाटील कोथरूडमधून सहा हजार मतांनी तर अजित पावार बारामतीतून 18 हजारे मतांनी आघाडीवर आहेत. इंदापूरमध्ये हर्षवर्धन पाटील राष्ट्रवादीच्या दत्त मामा भरणे यांच्यात चांगलीच चुरस पहायला मिळत आहे. पृथ्वीराज चव्हाण, रोहीत पवार, नितेश राणे, आदित्य ठाकरे आघाडीवर आहेत. काघेसच्या नेत्या प्रणितीशिंदे पिछाडीवर आहेत.