काठमांडू – योगाची सुरूवात सर्वप्रथम नेपाळमधून झाली. भारतातून झाली नाही, असा शब्दांमध्ये नेपाळचे काळजीवाहू पंतप्रधान के.पी. शर्मा ओली यांनी आज भारतविरोधी सूर आळवला.
जेंव्हा योगाची सुरूवात झाली तेव्हा भारत जगामध्ये अस्तित्वातच नव्हता. त्यावेळी भारत अनेक तुकड्यंमध्ये विभागलेला होता, असे ओली म्हणाले. आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने बालुवॉटर येथीत आपल्या निवासस्थानी झालेल्या कार्यक्रमाच्यावेळी बोलताना ओली यांनी हे वक्तव्य केले आहे. योगाबाबतचे हे सत्य भारतीय तज्ञ जगापासून दडवून ठेवत आहेत, असेही ओली म्हणाले.
योगाची उत्पत्ती झाली तेंव्हा आज दिसत असलेला भारत अस्तित्वातच नव्हता. तो तुकड्यांमध्ये विभागलेला होता. तो भारत म्हणजे एक खंड किंवा उपखंड होता, असे ओली म्हणाले.
संयुक्त राष्ट्राने 2014 मध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्याचे ठरवले.
त्यानंतर 2015 पासून आंतरराष्ट्रीय योग दिन 21 जून रोजी दरवर्षी साजरा केला जातो, 21 जून हा दिवस वर्षातील सर्वात मोठा दिवस असतो. म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दिवशी आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्याची कल्पना मांडली होती. श्रीरामाची जन्मभूमी अयोध्या नसून नेपाळमध्ये असल्याचा दावाही ओली यांनी गेल्यावर्षी केला होता.