नवी दिल्ली – देशात तंबाखू आणि धुम्रपानामुळे दिवसाला 3500 लोक मृत्यू पावतात. तर दरवर्षी जवळपास 13 लाख जणांचा मृत्यू हा तंबाखू आणि धुम्रपानाने होतो. आज ३१ मे हा दिवस जागतिक तंबाखू विरोधी दिन म्हणून साजरा केला जातो. या निमीत्ताने आज केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ही आकडेवारी प्रसिद्ध केली आहे. देशात तंबाखूचे सेवन करणाऱ्यांच्या संख्येत 6 टक्के घट झाली आहे. याआधी हे प्रमाण 34.6 टक्के इतकं होतं ते 28.6 टक्क्यांवर पोहोचलं आहे. अशी माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री डॉक्टर हर्षवर्धन यांनी दिली आहे.
भारत में हर वर्ष लगभग 13,00,000 के करीब मौतें तम्बाकू और धूम्रपान के कारण होती हैं जो लगभग 3,500 मौतें प्रतिदिन है। खासकर भारत में पिछले वर्षों के अध्ययन बताते हैं कि तम्बाकू का इस्तेमाल करने वालों की संख्या में 6% कमी आई है। यह 34.6% से 28.6% हो गया है:केंद्रीय स्वास्थ्य मंत्री https://t.co/PbCuIC6O4O
— ANI_HindiNews (@AHindinews) May 31, 2021
३१ मे हा दिवस जागतिक तंबाखू विरोधी दिवस म्हणून पाळला जातो. यादिवशी जगभरात तंबाखू आणि धुम्रपानाविरोधात लोकांमध्ये जनजागृती केली जाते. तंबाखू व धुम्रपानामुळे कर्करोग सारखा भयंकर आजार होतो. भारतात तंबाखूचे सेवन करणाऱ्यांच्या संख्येत 6 टक्के घट झाली आहे. याआधी हे प्रमाण 34.6 टक्के इतकं होतं ते 28.6 टक्क्यांवर पोहोचलं आहे. मागिल वर्षी करण्यात आलेल्या संशोधनातून ही माहिती समोर आली आहे.
डॉक्टर हर्षवर्धन यांनी माहिती देताना सांगितले आहे की, करोनामुळे होणारे धोकादायक दुष्परिणाम ज्यामध्ये मृत्यूचाही समावेश आहे याला तंबाखू आणि धुम्रपान करणारे लोक लवकर बळी पडतात. अशा लोकांमध्ये 40 ते 50 टक्के धोका जास्त असतो. तंबाखू आणि धुम्रपानामुळे फुफ्फुसला संसर्ग, हृदय विकार आणि कर्करोगाचा धोका असतो. इतकंच नाही तर शरीराच्या अनेक अवयवांवर परिणाम होऊ शकतो.
भारतात तोंडाचा कर्करोग हा धोकादायक अशा कर्करोगांच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. यामुळे प्रत्येक तासाला जवळपास पाच रुग्णांचा मृत्यू होतो. तंबाखूमध्ये निकोटीन हा घटक असतो. त्यातूनच तोंडाचा आणि फुफ्फुसाचा कर्करोग होण्याचा धोका असतो. या भयंकर आजारापासून वाचायचं असेल तर तंबाखूचे सेवन करणाऱ्यांनी वेळीच सावध व्हायला हवं असा इशारा तज्ज्ञांनी आज जागतिक तंबाखू विरोधी दिनाच्या निमित्ताने दिला आहे.