पिंपरी, (प्रतिनिधी) – टपाल कामगारांच्या अडीअडचणीवर मात करण्यासाठी दिल्ली स्तरावर त्या मांडण्यात येईल, असा ठराव पोस्टल संघटनेचे राज्यस्तरीय अधिवेशनात करण्यात आला. नॅशनल असोसिएशन ऑफ पोस्टल एम्प्लॉइज ग्रुप सी महाराष्ट्रचे 26 वे द्विवार्षिक अधिवेशन बुलढाणा येथे संपन्न झाले. या वेळी सहाय्यक मंडळ सचिवपदी पिंपरी चिंचवड येथील काळूराम पारखी यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
अधिवेशनाच्या उद्घाटन प्रसंगी राष्ट्रीय अध्यक्ष सुनील झुंजारराव, सेक्रेटरी जनरल नवी दिल्लीचे शिवाजी वासुरेड्डी, असिस्टंट सेक्रेटरी आशुतोष देशपांडे, जनरल सेक्रेटरी निसार मुजावर, तसेच प्रवर अधीक्षक गणेश अंभोरे आदी उपस्थित होते. अधिवेशनात राज्याच्या कानाकोपऱयातून उपस्थित प्रतिनिधींनी आपल्या विभागानुसार अडीअडचणी मांडल्या.
या अधिवेशनात पुढील दोन वर्षांसाठी नवीन राज्यस्तरीय कार्यकारिणी तयार करण्यात आली. त्यात अध्यक्षपदी राम भजन गुप्ता (मुंबई), कार्याध्यक्ष संतोष यादव (अहमदनगर), शिवाजी नवले (बीड), मंडळ सचिव संतोष कदम( ठाणे), धनंजय राऊत (नागपूर), सहाय्यक मंडळ सचिव काळूराम पारखी (पुणे पिंपरी चिंचवड),
संजय सनातन (औरंगाबाद), नंदू झलवा (गोवा), शिवाजी तोंडले (पंढरपूर), आर. एच. अभंग (मुंबई), जी. आर. पाटील (बुलढाणा), योगेश समडोळेकर (कोल्हापूर), खजिनदारपदी महादेव गोपाळघरे (मुंबई), खजिनदार विनोद जाधव, संघटक सचिव जी. बी. लोटे( नागपूर), ऑडिटरपदी धनंजय इंगोले (नवी मुंबई) यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
महिला कमिटीमध्ये विजया शहाणे (श्रीरामपूर), विनिता कुलकर्णी (ठाणे), उषा गोळे ( मुंबई), नीता किनारे (छत्रपती संभाजीनगर), विद्या वाघ (कोल्हापूर) यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
या अधिवेशनासाठी बुलढाणा विभागातील जितेंद्र पाटील, ज्ञानेश्वर मोतेकर, गजानन घुगे, ज्ञानेश्वर मोतेकर, सचिन गारडे इत्यादी पुढाकार घेतला. सूत्रसंचालन प्रल्हाद कचरे यांनी केले. आभार शरद खेडकर यांनी मानले, अशी माहिती महाराष्ट्र राज्याचे सहाय्यक मंडळ सचिव काळूराम पारखी यांनी दिली.