नवी दिल्ली – उत्तरप्रदेशात सध्या सर्वत्र सतत वीजेचा लपंडाव सुरू आहे. त्या खेरीज येथील वीजेची दरवाढही केली जात आहे. या पार्श्वभुमीवर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी अदित्यनाथ यांच्या सरकारचा खरपूस समाचार घेतला.
अरविंद केजरीवाल सध्या आपला पक्ष वाढवण्यासोबत त्यांनी दिल्लीमध्ये केलेल्या कामांची उदाहरणे देखील विविध राज्यातील जनतेला देताना दिसतात. केरीवाल यांनी दिल्लीमधील शाळा,सरकारी कार्यालये तसेच विजेच्या समस्या या सर्व गोष्टींचे रूप पालटून टाकलेले आहे. अशात दिल्लीत मोफत वीज पुरवली जात असताना भारतीय जनता पक्षशासित उत्तरप्रदेश राज्यात वीज का उपलब्ध नाही, असा सवालही त्यांनी केला आहे.
उत्तर प्रदेशात रोज अनेकदा वीज जाते. उत्तर प्रदेशात वीज मोफत देण्याचीही योजना नाही उलट, यूपीमध्ये वीज खूप महाग आहे. मग तरीही इतकी वीज कपात कशासाठी? असा सवाल केजरीवाल यांनी उपस्थित केला आहे. उत्तरप्रदेशात सध्या सातत्याने वीज जात आहे, त्यावरून सोशल मिडीयात अनेकांनी तक्रारी केल्या आहेत.
उत्तर प्रदेश में बिजली के खूब कट लग रहे हैं। उत्तर प्रदेश में तो बिजली फ्री नहीं है? उल्टे UP में बिजली बहुत महँगी है। फिर क्यों इतने पॉवर कट लग रहे हैं?
दिल्ली में बिजली फ्री भी है और 24 घंटे आती है। कोई पॉवर कट नहीं लगता। दिल्ली में पढ़े लिखे प्रोफेशनल ईमानदार लोगों की सरकार…
— Arvind Kejriwal (@ArvindKejriwal) June 25, 2023
युपीमधील विजेबाबत अनेकांनी केलेल्या तक्रारी पाहता केजरीवाल यांनी याबाबत सवाल उपस्थित केला आहे. केजरीवाल म्हणाले, आमचे सरकार दिल्लीतील रहिवाशांना दिल्लीत 24 तास अखंड वीज पुरवठा करत आहे.त्याशिवाय दिल्लीत वीज मोफतही आहे आणि ती 24 तास येते. दिल्लीत वीज कपात नाही. दिल्लीत सुशिक्षित, व्यावसायिक,आणि प्रामाणिक लोकांचे सरकार आहे, असे केजरीवाल यांनी एका ट्विटमध्ये म्हटले आहे.