ज्या पद्धतीने तंत्रज्ञान विकसित होत आहे ते पाहता रस्त्यावरील गाड्यांचे दिवसही लवकरच संपतील असे म्हटले जात आहे. जगभरात अनेक कंपन्या उडत्या कारला म्हणजेच फ्लाईंग कार प्रत्यक्षात आणण्याचा प्रयत्न करत आहेत. जर अशी कार भारतात (Flying Car In India) आली तर कितपत यशस्वी होईल? चला, जाणून घेऊया.
काही दिवसांपूर्वीच एका चिनी कंपनीने दुबईत फ्लाईंग कारची यशस्वी चाचणी केली आहे. त्यानंतर पुन्हा एकदा फ्लाईंग कारचे (Flying Car) स्वप्न पाहणाऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. फ्लाइंग कार X2 ने दुबईत पहिले उड्डाण केले. ही कार 35 मिनिटांत 560 किलो वजनही उचलू शकते. अतिशय हलक्या वजनाच्या कार्बन फायबरपासून ही कार तयार करण्यात आली आहे.
प्रदूषण घटेल
चिनी कंपनीने ज्या फ्लाइंग कारची चाचणी केली आहे ती इलेक्ट्रिक आहे. त्यामुळे प्रदूषणही होत नाही. ही कार भारतात आल्यास रस्त्यावरील रहदारी कमी होण्याबरोबरच वाढत्या प्रदूषणापासूनही सुटका होईल.
आपत्कालीन सेवेस उपयुक्त
आजच्या काळात रस्त्यावर ज्या प्रकारे वाहतूक होते, ती पाहता गंभीर अवस्थेत असलेल्या रुग्णाला वेळेवर रुग्णालयात पोहोचवणे हे अत्यंत आव्हानात्मक काम असते. जर फ्लाईंग कार भारतात आली तर ती रुग्णाला वेळेत वैद्यकीय मदत मिळवून देण्यात खूप उपयुक्त ठरेल. वैद्यकीय मदतीबरोबरच अग्निशमन दलालाही यातून मोठी मदत होऊ शकेल.
पार्क करणे सोपे होईल
फ्लाइंग कारची रचना ज्या पद्धतीने केली जात आहे. त्यामुळे कमी जागेत ही गाडी पार्क करता येते. त्यासाठी घरात स्वतंत्र पार्किंगची गरज भासणार नाही. त्याऐवजी घराच्या छतावरच लँडिंग करता येते आणि तेथूनच टेक ऑफ देखील करता येईल.
किती फायदा होईल?
फ्लाइंग कार भारतात आल्यावर रस्त्यांची गरज कमालीची कमी होईल. कारण ही कार तुमचे घर, ऑफिस अशा ठिकाणाहून थेट उड्डाण करू शकते आणि त्यासाठी धावपट्टी, रस्त्यांची गरज भासणार नाही. त्यामुळे रस्ते बांधणीचा मोठा खर्च कमी होऊन पर्यावरणाची हानी कमी होईल. यातून वाचलेला पैसा देशाच्या उर्वरित विकासकामांसाठी वापरता येईल.
सुधारणा आवश्यक असेल
फ्लाइंग कार आल्यावर आपण त्यावर पूर्णपणे अवलंबून राहू, असे नाही. चिनी कंपनीने यशस्वी चाचणी घेतलेली फ्लाइंग कार केवळ 90 मिनिटांचा प्रवास करू शकते. म्हणजेच या कारला उड्डाणाच्या मर्यादा आहेत. अशा परिस्थितीत एखाद्याला दूरवर जावे लागले तर मोठी अडचण निर्माण होऊ शकेल.
पायाभूत सुविधा नाहीत
भारतासारखा देश अद्याप अशा तंत्रज्ञानासाठी तयार नाही. इलेक्ट्रिक वाहने चार्ज करण्यासाठी पायाभूत सुविधाही देशात तयार करण्यात येत आहे. पण फ्लाइंग कारसाठीही पायाभूत सुविधा तयार केल्या तर कालांतराने मोठी गुंतवणूक करावी लागेल.
किंमत जास्त असेल
अशी कार बाजारात येऊ शकते पण ती सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर असेल. कारण हे नवीन तंत्रज्ञान आहे. अनेक कंपन्यांनी या तंत्रज्ञानात अद्याप प्रभुत्व मिळवलेले नाही. या कारणांमुळे ते फक्त श्रीमंत लोकांपर्यंतच पोहोचेल. त्याचबरोबर सर्वसामान्यांपर्यंत पोहोचण्यास बराच कालावधी लागणार आहे.
कोणताही नियम कायदा नाही
फ्लाइंग कारसाठी केवळ भारतातच नाही तर जगातील कोणत्याही देशात अद्याप कायदा नाही. अशा गाड्या आल्या तर त्यांना चालवायला देण्याआधी सरकारला कायदा करावा लागेल. त्यांना सामान्य कार परवान्यावर चालवता येत नाही.
सुरक्षेसंदर्भात साशंकता
जगात सर्वाधिक रस्ते अपघात होणाऱ्या देशांपैकी भारत एक आहे. वाहन चालवण्यात निष्काळजीपणा, निद्रानाश, अतिवेगाने वाहन चालवणे, बेदरकारपणे वाहन चालवणे अशा कारणांमुळे दररोज गंभीर अपघात होत आहेत. हे फक्त रस्त्यावरच घडते. मात्र उडणारी कार आकाशात उडणार असेल तर अपघातांवर मात करणे हे कोणासाठीही मोठे आव्हान असेल.