भवानीनगर – वातावरणात गारवा निर्माण होऊन थंडी पडू लागल्याने गव्हाच्या उत्पादनात मोठी वाढ होईल, असे चित्र परिसरात दिसत आहे. गव्हाचे पीक उगवून आले आहे. त्यावेळी थंडीचे प्रमाण कमी होते. परंतु पाच ते सहा दिवसांपासून वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. थंडी पडत असल्याने गव्हाचे पीक जोरदारपणे डोलताना दिसत आहे.
इतर पिकांमध्ये शेतकरी आर्थिक अडचणीत आला असताना गव्हाच्या पिकामध्ये मात्र चार पैसे शेतकऱ्यांना मिळतील, अशी आशा पल्लवित झाल्या आहेत. गेल्या वर्षी थंडीचे प्रमाण जादा होते. त्यावेळी रब्बी हंगामातील पिकांमध्ये समाधानकारक उतारा मिळाला होता.
यावेळी थंडीचा कालावधी आता जेमतेम दीड महिनेच राहिला आहे. त्यामुळे इतक्या कालावधीत पिकांना पोषक वातावरण मिळणार काय, याची चिंता सतावत आहे.