पुणे – मुंबई चेन्नई राष्ट्रीय महामार्ग (highway) क्रमांक 48 हा पुणे -सातारा-कोल्हापूर (pune-satara-kolhaapur) या शहरांना जोडतो सलग जोडून सुट्ट्या आल्यानंतर महामार्गावर वाहनांची अभूतपूर्वक कोंडी होत असते.
अनेकदा रस्त्यांची अवस्था ठीक नसते आणि अशाच वाहतूक कोंडी मध्ये नागरिकांना अडकून पडावे लागते टोल नाक्यावरील गर्दी आणि खंबाटकी घाटामध्ये नेहमीच ट्रॅफिक जाम यामुळे या रस्त्यावरील प्रवास दिवसेंदिवस अवघड बनत चालला आहे अशी वाहन चालकांची भावना आहे.
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 48 महत्वाचा महामार्ग मानला जातो उत्तर आणि दक्षिण भारताला जोडणारा हा महत्त्वाचा रस्ता असूनही राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे या रस्त्याच्या देखभालीकडे दुर्लक्ष झाल्याचे दिसते. अनेक ठिकाणी सेवा रस्त्यांची उपलब्धता नाही अनेक ठिकाणी उड्डाणपूल यांची कामे प्रलंबित आहेत.
आणि अशातच वाढती वाहन संख्या आणि घाटातील अरुंद रस्ता यामुळे प्रवाशांना दरवेळेस वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो त्यामध्ये अनेकदा खंबाटकी बोगद्यामधून दुहेरी वाहतूक सुरू ठेवावी लागते.
एका बाजूला सहा पदरी नव्या खांबाटकी बोगद्याचे काम सुरू असल्याचे सरकार सांगते मात्र हे काम दोन वर्ष प्रलंबित राहिले आहे त्यामुळे अजून किमान दोन वर्षे या रस्त्यावरील वाहतूक कोंडी सुटणार नाही असे चिन्ह दिसत आहे.