अजून थोडे दिवस …असे म्हणत म्हणत तब्बल एक महिन्यापेक्षा अधिक कालावधीसाठी आपण घरात कैद आहोत. करोना आणि त्याने होणारी मनुष्यहानी, कोसळणारी अर्थव्यवस्था निश्चितच चिंताजनक आहे. पण हे संकट आपल्याला अनेक गोष्टी शिकवत आहे. ग्रामीण संस्कृतीचा शाश्वत पाया आणि शहरी संस्कृतीचा पोकळ डोलारा यांची जाणीव पुन्हा एकदा झाली. कृषिआधारीत अर्थव्यवस्था आज वरदान ठरत आहे. आर्थिक प्रगती आणि विकास म्हणजे नेमकं काय याचा पुनर्विचार होणं, आज गरजेचं वाटत. नागरीकरण पश्चत्यिकारणाच्या नावाखाली बिघडलेली जीवनशैली, मनोरंजन आणि आनंदाच्या चुकीच्या संकल्पनाची जाणीव झाली.
नेहमी व्यस्त राहन, आधुनिकपणाच्या नावाखाली निकस फास्टफूड पोटात ढकलन अविरत चालू होतं. मात्र, याकाळात नेहमीपेक्षा कधी नवीन गोष्टी करून पहिल्या, कुटुंबासोबत वेळ घालवला. कधी पुस्तकं वाचली. आवडते छंद जोपासण्यासाठी वेळ मिळाला. पण हे सगळं जे आपल्याला उमगलं आहे, ते किती दिवस आपण आचरणात आणू?.करोना संपल्यानंतर परिस्थिती पुन्हा जैसे थे होईल का? माणूस फार तात्पुरता विचार करतोय. आज जो संयम आपण दाखवतो आहोत, तो लॉकडाऊन नंतर दाखविणे गरजेचं आहे. करोनाग्रस्तांसाठी जीवाची बाजी लावणाऱ्यांप्रती कृतज्ञता बाळगा.
भारती काटुळेसहायक निबंधक सहकार विभाग, नगर. संपर्क: 9226774987
करोना आजारापासून स्वत:ला सुरक्षित ठेवण्याचा उपाय म्हणजे हात स्वच्छ धुणे. चेहरा आणि डोळे यांना हाताने स्पर्श न करणे. फ्लू आणि कोरोना व्हायरस यापासून वाचवण्याचा सध्या हा एकच प्रतिबंधक उपाय आहे. हवेतून विषाणूचा फैलाव होऊ नये म्हणून चेहऱ्यावर मास्क लावणे हॉस्पिटल कर्मचाऱ्यांसाठी अत्यावश्यक ठरले आहे. गर्दीच्या ठिकाणी प्रवास करायचा असल्यास तोंडावर स्वच्छ रुमाल बांधणे पुरेसे आहे. लोकल, बस, सिनेमागृहे, यात्रा शक्यतो टाळा. स्वत:च्या वाहनातून प्रवास करताना वाहने स्वच्छ ठेवा. दरवर्षी संशोधक फ्लू प्रतिबंधक लस विकसित करत असतात. पण आज कोरोनाव्हायरसवर प्रतिबंधक अशी लस उपलब्ध नाही.
नजीकच्या काळात ती तयार होण्यासाठी मानवी प्रयत्नांची पराकाष्ठा व संशोधनावरील निधीवर हे अवलंबून आहे. एकदा लस तयार झाली, तरी त्याच्या प्राण्यावर आणि मानवी चाचण्या होईपर्यंत दुसरा विषाणू मानवी संसर्गाची वाट पाहात असतो. जैविक उत्क्रांतीमध्ये ज्या सजीवांमध्ये प्रतिकार क्षमता कमी असते. त्यांना विषाणूजन्य व जीवाणूजन्य आजार होण्याची शक्यता अधिक असते. प्रतिक्षमता क्षीण होण्याचे एक महत्त्वाचे कारण आंतर प्रजनन. एकाच समुदायातील बंदिस्त प्रजनन. बर्ड फ्लू चीनी बदकांमध्ये आला व मानवांमध्ये पसरला. स्वाईन फ्लू पाळीव डुकरांमधून जेव्हा आला. कोरोनाव्हायरस कशापासून उत्क्रांत झाला हे अजून उघडकीस यायचे आहे. तोपर्यंत फक्त काळजी घेणे एवढेच आपण करू शकतो.
संजय भापकर,गुंडेगाव, ता. नगर । संपर्क : 8600117279