8 मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवशी शेती, उद्योग, तंत्रज्ञान, शिक्षण, आरोग्य, संरक्षण, अंतरयान, माहिती सेवा ,कला अशा क्षेत्रात उत्तुंग भरारी घेऊन देशाचे नाव यशोशिखरावर पोहचविणारया महिलांचा गुणगौरव करण्याचा हा दिवस.
असे असले तरी जशा नाण्याला दोन बाजू असतात, छापा आणि काटा त्याच प्रमाणे प्रत्येक गोष्टीला दोन बाजू असतात ” चांगले आणि वाईट ” स्त्रिया प्रत्येक क्षेत्रात उत्तुंग भरारी घेत असल्या तरी त्याच समाजात तिच्यावर अन्याय, अत्याचार होत आहे. एकीकडे तिचा सन्मान, सत्कार, आदर करण्याचा हा दिवस आणि बाकीचे अन्याय, अत्याचार सहन करण्याचे दिवस.
आजचे युग हे सोशिअल मीडीयाचया जवळ गेले असून सोशिअल मीडीया हा त्यांच्या जीवनाचा अविभाज्य घटक झालेला आहे. कोणत्याही प्रकारची घटना की तिचा प्रसार ह्या माध्यमांद्वारे पूर्ण जगभर होतो. सोशिअल मीडीयाचया वापर तरूण पिढी करत असून ते पाॅरन सारख्या वेबसाईटला भेट देत आहे. त्यातूनच हैदराबाद, कोपरडी, दिल्ली निर्भया सारखी प्रकरणे घडतात. पुन्हा जग एकत्र येऊन कैंडल मार्च, मोर्चे, आंदोलन, उपोषण करण्यात येईल. मुलींना बंधने घातली जातील, सोशिअल मीडीयाला आवर घाला असे ऐकायला/ वाचायला मिळेल. वास्तवात सोशिअल मीडीया , मुलींवर बंधने घालून समाजातील स्त्रियांवर होणारे अत्याचार थांबणार नाहीत. सोशिअल मीडीया हे एक वरदान आहे. काही लोक त्या माध्यमांचा चुकीचा वापर करतात त्यामुळे अशा माध्यमांना दोष देणे चुकीचे आहे. हे सर्व थांबवण्यासाठी समाजातील लोकांची मानसिकता आणि दृष्टिकोन बदलायची गरज आहे. तरच ह्या गोष्टींना आळा बसेल. “भारत माता की जय ” अशा घोषणा आपण देतो आणि स्त्रियांवर अत्याचार करतो.हे सर्व एका दिवसांने महिला दिन साजरा करून थांबणार नाही.
स्त्रि ही अगाध शक्ती आहे. झाशीची राणी, मदर तेरेसा , राजमाता जिजाऊ, सावित्रीबाई फुले, अशा अनेक महिलांचा इतिहास सोनेरी अक्षरात लिहिला गेला. आजही समाजामध्ये साक्षी मलिक, सानिया मिर्झा, पी.टी.उषा, सिंधूताई सपकाळ यां सारख्या महिला विविध क्षेत्रात उत्तुंग भरारी घेत आहेत. स्त्रिचे नेतृत्व उभरते, चढते असले तरी समाजातील लोकांनी तिच्याकडे पाहण्याचा वेळीच बदलला नाही तर असे कितीही महिला दिन साजरा करून उपयोग नाही…
समाज केवळ स्त्रि म्हणून नाही तर एक माणूस म्हणून स्त्रिकडे कधी पाहणार? हया प्रश्नाचे उत्तर मिळेल त्या दिवशी महिला दिन साजरा झाला;त्या दिवसासाठी महिलांचा आदर, सन्मान, 31,557,600 सेकंद; 525,600 मिनिट; 8760 तास;365 दिवस आणि 52 आठवडे महिला दिन साजरा झालाच पाहिजे…
– प्रियांका निवडुंगे,
कॉलेज रिपोर्टर,
सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालय, तळेगाव