पिंपरी – समाविष्ट गावांच्या विकासाचा मुद्दा हातात घेवून विकासकामांना गती देण्याची भूमिका घेतली आहे. नवीन पाणी उपसा पंपामुळे चिखली व परिसरातील पाणी पुरवठा सक्षम होणार आहे. समाविष्ट गावांतील पाणी प्रश्न सोडवण्यास यश मिळाले आहे, असे प्रतिपादन आमदार महेश लांडगे यांनी केले आहे.
चिखली आणि परिसरातील सुमारे 90 हजार नागरिकांच्या पाणीपुरवठा सक्षम करण्यासाठी महापालिका प्रशासनाच्या माध्यमातून चिखली जलशुद्धीकरण केंद्रातून थेट पाइपद्वारे पाटीलनगर येथील जलकुंभात पाणी पुरवठा करण्यासाठी स्वतंत्र पंप बसवण्यात आला आहे. त्याचे लोकार्पण आमदार लांडगे व समस्थ ग्रामस्थ चिखली यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
या वेळी माजी महापौर राहुल जाधव, माजी नगरसेवक सुरेश म्हेत्रे, कुंदन गायकवाड, सुरेश लोखंडे, दिनेश यादव, विनायक मोरे, अंकुश मळेकर, अमृत सोनवणे, यशवंत साने, पांडाभाऊ साने, निलेश नेवाळे, किसन बावकर, प्रदीप आहेर, पिंपरी-चिंचवड सोसायटी फेडरेशनचे अध्यक्ष संजीवन सांगळे, जितेंद्र यादव, दिनेश लोखंडे, नवीन बग, संदीप शेलार, संतोष जाधव, गणेश भुजबळ, अविनाश मोरे, संदीप नेवाळे, तुकाराम जाधव, सदाशिव नेवाळे, कार्यकारी अभियंता रामनाथ टकले, मिलन दौंदर, अभियंता रमेश जिंतीकर आदी उपस्थित होते.