आळंदी – इंद्रायणी नदीत मोठ्या प्रमाणात प्रदूषित पाण्याचा विसर्ग होत असून त्याचा ताण जलशुद्धीकरण यंत्रणेवर आला असल्याने आळंदी परिसरात मंगळवार (दि.31) पासून दिवसाआड पाणीपुरवठा होणार आहे.
नागरिकांच्या आरोग्य हिताच्या दृष्टीने जलशुद्धीकरण प्रक्रियेचे प्रमाण वाढवल्याने तसेच साठवण बांधऱ्यात गाळ, जलपर्णीची वाढ होत असल्याने जलशुद्धीकरण यंत्रणेवर ताण आल्याने जल टाकी भरण्यास वेळ लागत आहे.
त्यामुळे मंगळवार (दि. 31) पासून हवेली विभाग व बुधवारी (दि. 1 जानेवारी) पासून आळंदी विभाग याप्रमाणे दिवसाआड झोनपद्धतीने नवीन जलवाहिनीद्वारे पुरेशा दाबाने पाणी वितरण करण्यात येणार आहे.
तरीही नागरिकांनी पाण्याचा वापर काटकसरीने करून नगर पालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन नगराध्यक्षा वैजंयता उमरगेकर, मुख्याधिकारी समीर भूमकर यांनी केले आहे.