तळेगाव ढमढेरे-टाकळी भीमा येथे ग्रामसुरक्षा यंत्रणेबाबत कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी ग्रामसुरक्षा दल यंत्रणा महाराष्ट्रात यशस्वी असल्याचे प्रतिपादन ग्रामसुरक्षा यंत्रणेचे संचालक डी. के. गोरडे यांनी केले.
टाकळी भीमा (ता. शिरूर) ग्रामपंचायत येथे ग्रामसुरक्षा यंत्रणेमार्फत कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. यावेळी टाकळी भीमा गावातील नागरिकांच्या व गावच्या सुरक्षतितेच्या अनुषंगाने संकटवेळी संपूर्ण गावकऱ्यांना एकच कॉल करून, सावध करून मदतीला बोलावण्यासाठी किंवा संपूर्ण गावकऱ्यांना एकाच वेळी सूचना देण्यासाठी जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण यांच्या आदेशानुसार ग्रामसुरक्षा यंत्रणा कार्यान्वीत करण्याबाबतची कार्यशाळेमध्ये मार्गदर्शन करताना विविध उदाहरणे देऊन ग्रामस्थांना सर्वसामान्य उपयोगी माहिती दिली. यावेळी पोलीस अधिकारी विक्रम साळुंके, टाकळी भीमा गावचे पोलीस पाटील प्रकाश कर्पे, सरपंच रविंद्र दोरगे, उपसरपंच पांडुरंग ढोरे, पोलीस अनंता बाठे, युवा शिवव्याख्याते आकाश वडघुले, निखील पोखरकर, पांडुरंग काळे. दत्तात्रय काळे, सचिन घुमे, निवास साकोरे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष शरद पाटोळे, संतोष राऊत आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
- ग्रामीण भागात पोलीस यंत्रणेला काही प्रमाणात अडथळा आल्यामुळे घटनेच्या ठिकाणी पोहोचण्यास उशीर लागत आहे. त्यामुळे ग्राम सुरक्षा यंत्रणेचा सर्वसामान्य जनतेने वापर केल्यास गावातील सर्वांना वेळेत मदत मिळेल. या योजनेचा गावातील ग्रामस्थांनी वापर करावा.
-विक्रम साळुंखे, सहायक पोलीस निरीक्षक, शिक्रापूर - ग्रामसुरक्षा यंत्रणा ही गावाच्या सुरक्षितेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची व नाविन्यपूर्ण योजना आहे. या योजनेमुळे सर्व ग्रामस्थांच्या सुरक्षेत वाढ होऊन ही योजना यशस्वी करण्यासाठी गावातील प्रत्येक घरोघरी पोहोचून प्रयत्न करणार आहे.
-प्रकाश कर्पे, पोलीस पाटील टाकळी भीमा