बॉलीवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूतने आपल्या करियर आणि आयुष्याबद्दल कोण-कोणती स्वप्ने पाहिली नसतील, परंतु आत्महत्या केल्याने ही सर्व स्वप्ने चिरडली गेली आणि तोही सर्वापासून दूर गेला. स्वतःचा “दिल बेचारा’ हा चित्रपटदेखील पाहण्याचे त्याचे स्वप्न अपूर्ण राहिले.
Izzat aur pyaar maanga nahi kamaya jaata hai. Koi na de toh usse hum chhote nahi hote. Bas maidaan khelne ke liye barabar de do chhalaang hum bhi oonchi laga sakte hai 🙏
— kunal kemmu (@kunalkemmu) June 29, 2020
सुशांतसिंह राजपूतंचा “दिल बेचारा’ हा शेवटचा चित्रपट आता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आता कोरोना लॉकडाऊनमध्ये काही चित्रपट ऑनलाइन म्हणजे ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहेत आणि यावरून आता पुन्हा बॉलीवूड नेपोटिझमचा मुद्दा उपस्थित झाला आहे.
विद्युत जामवाल आणि कुणाल खेमू या दोघांनीही हिंदी फिल्म इंडस्ट्रीत खूप स्ट्रगल करून आपली ओळख बनवली. तरीदेखील अजून त्या इंडस्ट्रीत जागा दिली जात नाही आहे. यातच बॉलीवूड नेपोटिझमच्या मुद्यावरून या दोन अभिनेत्यांनी ट्विट करत आपली प्रतिक्रिया दिली आहे .
‘इज्जत आणि प्रेम मागून कमवली जात नाही. कुणी ती देत नसेल तर आम्ही छोटे नाही होत. फक्त खेळण्यासाठी मैदान सारखंच द्या. आम्हीदेखील मोठी उडी मारू शकतो”, असं कुणालनं म्हटलं आहे.
‘विद्युत म्हणाला, “ही मोठी घोषणा नक्कीच आहे. सात चित्रपट रिलीज होत आहेत मात्र फक्त 5 फिल्म्स प्रमोशनच्या लायक असल्याचं समजण्यात आलं आहे. दोन चित्रपटांचा यात उल्लेखही नाही. हा खूप मोठा रस्ता आहे आणि हे चक्र असंच सुरू राहणार आहे”